वसगडे / वार्ताहर
वसगडे ( ता.पलूस) येथील अर्जुन वाटेवरील शेतकरी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अडचणीत सापडले आहेत. यंदाच्या सोयाबीनच्या मळणीसाठी तब्बल चार टॅक्टर जोडून मळणी मशीन बांधावर नेण्याची वेळ आली. तसेच हजारोंचा माल शेतात अडकून पडल्याने द्विध्दा मनस्थितीत सापडलेल्या शेतकर्यांनी काही शिल्लक राहणार नाही माहीत असताना मळणी करुन धान्य बाहेर काढले. ही शेतकर्यांची होणारी अडचण पलूस पं.स.सदस्य अमोल पाटील यांनी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांना सांगितली असता कदय यांनी आपला दौरा थेट अर्जुन वाटेवरील बांधावर वळवला. तसेच पाहणी करुन शेतकर्यांशी चर्चा करुन संबधित अधिकार्यांना सूचना दिल्या.
या मार्गावरील ७०० एकर हुन अधीक शेती बागायती आहे मात्र रस्त्याचा प्रश्न जटील बनला होता. यामार्गावर अल्पभूधारक, पशुपालक शेतीवर निर्भर शेतकर्यांना खत टाकण्याबरोबर वैरण आणणेसाठी दररोज अडचणीचा सामना करावा लागतो. कृषी राज्यमंत्र्यानी थेट बांधावर येऊन समस्या ऐकून घेत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने शेतकर्यांचा आशा पल्लवीत झाल्या आहेत.