प्रतिनिधी / कडेगाव :
कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांच्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोटारीची बिले भरली नाहीत म्हणून महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांनी ट्राँन्सफार्मर बंद करून जोरका झटका दिला आहे. इतिहासात प्रथमच वांगी (ता.कडेगाव) परिसरांतील शेतीपंपांच्या वसूलीसाठी महावितरणने ट्रान्सफाँर्मरच बंद करण्याची मोहिम हाती घेतली आहे. 25 ट्रान्सफाँर्मर बंद करून शेतीपंपांचा विद्युतपुरवठा खंडीत केला आहे. खरीप हंगामातील पिके करपून शेतीचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनी राज्य शासनाचा निषेध केला आहे.
खरोखरच थकबाकी, वादग्रस्त बील याकरिता वीज पुरवठा बंद करण्यासाठी स्वतंत्र नोटीस प्रत्येक थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना देणे अनिवार्य आहे. ही नोटीस वीज कायदा २००३सेक्शन ५६व वीज ग्राहक अटीवशर्ती क्रं.१५नुसार आवश्यक आहे हे त्या कनिष्ठ अभियंत्यांला माहित नाही का आपल्या पदाचा थकबाकी वसुलीसाठी पठाणी पद्वतीचा गैरवापर नाही का सरासरी अंदाजे किंवा मीटर न फोटो काढता (शेतात मोटार असली तरी फोटो काढणे आवश्यक) वीज बील आकारणे बेकायदेशीर आहे. ग्रा. स. कायदा १९८३ परीपत्रक क्र १३६८५ दि. ६/५/२००५ नुसार वीज ग्राहकांस भरपाई प्रती आठवडा रु१००प्रमाणे देणे आवश्यक आहे. हे ही त्या मनमानी करण्याऱ्या अभियंत्यांला माहित असू नये यासारखे दुर्दैव कोणते किंवा माहित असून ही जाणिवपुर्वक शेतकऱ्यांची कोंडी करून वसुली करण्याचा ही अघोरी पद्धत अवलंबली आहे. कडेगाव तालुका हा कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांचा मतदारसंघ आहे. माजी मंत्री दिवंगत डॉ.पतंगराव कदम यांनी ताकारी योजनेसाठी ताकत लावली होती. माळरानावर कुसळे उगवत होती तिथे उस डोलाताना दिसतआहे. ताकारी टेंभु योजनेची विजबिले थकीत असली तरी योजनेचे पाणी शेतकऱ्यांच्या पाटात यायचे परंतु कदम यांच्या निधनाने या मतदारसंघात अधिकारी वर्गावरचा वचक संपुष्टात आला असल्याचे चित्र दिसत आहे. महावितरणने केलेली कारवाई ही शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे वरीष्ठ अधिकारी महावितरणाचे या मनमानीला चाप घालणार की कनिष्ठ अभियंत्याला पाठीशी घालणार का?
वांगीचे क्षेत्र सर्वाधिक असून महावितरणने शेतीपंपासाठी सुमारे 175 ट्रान्सफाँर्मरची उभारणी केली आहे. यावर 4 हजार शेतीपंपांच्या जोडण्या आहेत. सदर शेतीपंपांची एकूण थकबाकी सुमारे 15 कोटी रुपये आहे. महाराष्ट्र शासनाने शेतीपंपांच्या थकबाकीत 50 टक्के माफी दिली असून त्याची रक्कम देण्याचे लेखी आश्वासन महावितरणला दिले आहे. त्यामुळे उर्वरीत 50 टक्के वसूलीसाठी महावितरण कठोर पावले उचलत आहे. याची सुरुवात कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांच्या तालुक्यातील वांगी गावापासून झाली आहे.
यानुसार मंगळवारपासून वांगी परिसरांतील 25 ट्रान्सफाँर्मर पूर्णतः बंद केले आहेत. यावर असणाऱ्या शेतीपिकांना पाणी मिळणे बंद झाले असून नुकसान होत आहे. अशा प्रत्येक ट्रान्सफाँर्मरवर किमान 40 लाख रुपये थकबाकी आहे. यावरील किमान 10 टक्के रक्कम भरा अशी विनवणी महावितरण कर्मचारी शेतक-यांना करीत आहेत. मात्र प्रतिसाद मिळत नाही. परिणामी काही दिवसांत वांगी परिसरांतील शेतीपंपाचे सर्व ट्रान्सफाँर्मर बंद केले जाणार आहेत. आणि ज्या ठिकाणी 50 टक्के रक्कम भरली जाईल ते सुरु केले जातील असे समजते. शेतक-यांना अजून आठ-पंधरा दिवसांची मुदत द्यावी. अशी मागणी वांगी परिसरांतील शेतक-यांतून होत आहे.परंतु या घटनेने शेतकरी वर्ग संतापला असुन राज्य शासनाचा निषेध केला आहे.आता तरी कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांनी लक्ष देउन याबाबत योग्य तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी शेतकरी करु लागले आहेत.