भारतातील सध्याची पीक परिस्थिती लक्षात घेतल्यास असे स्पष्ट दिसते, की भारतातील बहुतेक पिकांना पाण्याची अधिक गरज आहे. भात, ऊस आणि भाजीपाला पिकांना जास्त पाणी लागते. देशातील शुद्ध पाण्यापैकी 80 टक्के पाणी शेतीसाठी वापरले जाते, तेही अंधाधुंदपणे. विशेषतः ऊस आणि भाताला वापरल्या जाणाऱया पाण्याचा अपव्यय होतो. निर्यात केल्या जाणाऱया शेतमालामध्ये तांदूळ आणि साखरेचा समावेश होतो. अप्रत्यक्षपणे आपण पाण्याचीच निर्यात करीत आहोत. त्यामुळे पाणीप्रणीत पीक संरचनेचा त्याग करून कौशल्य व श्रमप्रधान उत्पादनाची पिके घेऊन देशाच्या संसाधनेची बचत करणे आवश्यक बनले आहे. मूल्यवर्धित शेतमालाच्या उत्पादनाला प्राधान्य देणे आवश्यक आहे.
मूल्यवर्धित शेतमालाच्या उत्पादनासाठी आधुनिक शेती आणि अधिक बौद्धिक भांडवलाचा वापर अपरिहार्य आहे. वायरलेस शेती, न्यूट्री फार्मिंग, न्यूटॅमिटिकल फार्मिंग, शून्य आधाराची शेती संरचना, सेंद्रिय शेती, अचूक निदानाची शेती, सेन्सार, ड्रोन आणि रोबो यासारख्या इलेक्ट्रॉनिक तंत्राचा वापर करून शेती कसण्याच्या पद्धती, जैन तंत्रज्ञान आणि नॅनो तंत्रज्ञानाची शेती, जीएमओ तंत्राची शेती, कॅस्पर कॅस 9 व 12 च्या तंत्राने करावयाची शेती, ऊती संवर्धन तंत्राची शेती, ज्ञानवर्धित शेती तंत्रज्ञान अशा अनेक शेती पद्धती सध्या अस्तित्वात आहेत. उर्ध्व शेती, शहरी शेती, दुष्काळी पीक संरचना(ड्रॉट रेजिटन्स ऍग्रीकल्चर), रुफटॉप ऍग्रीकल्चर पद्धतीदेखील लोकप्रिय होत आहेत. या प्रकारच्या शेती पद्धतीमुळे शहरी संस्कारातील महिलांना त्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने लाभदायक ठरत आहे. त्यांना निर्मितीचा आनंद मिळत आहे. किचन गार्डनिंगचा लाभ महिलांना घेता येतो. घरातील काडी-कचऱयाचा आणि वाया जाणाऱया जलसाधनांचा वापर केल्यामुळे पर्यावरणीय सुलभता निर्माण होऊन शाश्वत व चिरंतन विकासाची अभिलाषा व्यक्त केली जात आहे. या प्रत्येक पद्धतीमध्ये प्रगत विज्ञान असल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट कमी आहेत. प्रत्येकवेळी विक्री योग्य उत्पादनाचाच विचार केला पाहिजे असे नाही. स्वतःसाठी शेती कसणे आता आवश्यक बनले आहे.
कृषी व्यवस्थेतील कौशल्ये अनेक प्रकारची आहेत. कोणत्या पद्धतीच्या शेती व्यवस्थेला कोणते कौशल्य केव्हा लागणार आहे, याचे नियोजन आणि विज्ञान-ज्ञाननि÷ा लक्षात घेऊन शेती-व्यवहार करावे लागतात. उदा. सेंद्रिय पद्धतीची शेती करावयाची झाल्यास त्यासंबंधी बरेच जाणून घेणे आवश्यक असते. दोन-तीन वर्षे सातत्याने कृषी नियोजन करून मग त्याच्या सर्टिफिकेशनसाठी प्रयत्न करावे लागतात. तज्ञांच्या पाहणीदरम्यान सर्व प्रश्नांची उत्तरे त्यातील सातत्ये आणि प्रयोग तपासून मग तसा दाखला दिला जातो. त्यासंबंधीची गुपिते आपल्याकडे ठेवता येतात. कारण वाणिज्यकीय प्रसिद्धीसाठी शेतकऱयांचे नाव-उत्पादन ग्राहकांसाठी ब्रॅण्डेड नावानी प्रसिद्ध करायचे असते. कौशल्ये केव्हाही लर्निंग बाय डुईंग पद्धतीने अवगत करावी लागतात. एका टास्कमधून दुसऱया टास्ककडे वळण्याची शेतकऱयाची तयारी असावी लागते. शेतकऱयाला ऍग्रीप्रन्युअर व्हावे लागते. माती, हवामान, पीक संरक्षण, खत मात्रा, पॅकिंग, बाजारपेठ, ग्राहकांची अभिरुची व त्याची उत्पन्न पातळी लक्षात घेऊन शेती व्यवहारातील डावपेच आखावे लागतात. उष्ण, थंड, वर्षाप्रमाण, वादळ, हवामानबदल यासारख्या समस्यांना हिरिरीने सामोरा जाणारा आणि तात्काळ प्रश्न सोडविणारा ऍग्रीप्रन्युअर असावा. संकटावेळी डोके धरून बसणारा आणि आत्महत्येचा विचार करणारा बिलकुल असू नये. स्वतः बलवान, बळकट, निष्ठूर आणि संयोजन कौशल्याचा वापर करणारा शेतकरी असला पाहिजे. शेती व्यवहाराचे संघटन सहजपणे करणारा आणि वेळेवर निर्णय घेऊन ते अमलात आणणारा शेतकरी असावा. अभ्यासू, मेहनती, सल्ला ऐकणारा व सल्ले घेणारा आणि स्वतःच्या मताप्रमाणे वागणारा असावा.
संघटन कौशल्ये आणि व्यवस्थापन कौशल्ये अवगत असावीत. कोणत्याही संकटाला धीराने आणि आत्मविश्वासाने हाताळता आले पाहिजे. नियमित पेपरवर्क करावे. तज्ञांची गरज लागते त्यावेळी ते जरूर घ्यावे. व्यवस्थापन कौशल्यामुळे शेतकरी नेहमी जागरुक असतो. इतरांच्या तुलनेने अत्यंत कुशलपणे सर्व शेती व्यवहार हाताळता आले पाहिजेत. मध्यस्थ व खरेदीदाराशी व्यवहार करताना जागरुक व आपल्या हिताचे पहावे. अति उदारवादी असू नये.
पिकांच्या लागवडीपासून ते ग्राहकांच्या ताटापर्यंतच्या (फार्म टू फोर्क) सर्व टप्प्यातील कार्यामध्ये एकवाक्मयता, पारदर्शकता आणि परिवर्तनीयता दिसली पाहिजे. उदा. सेंद्रिय शेतीसाठी सेंद्रिय घटकाचा वापर अपरिहार्य असला पाहिजे. जमीन रोगट ठेवून पिके सेंद्रिय पद्धतीने हाताळून उपयोग होत नाही. मृद आरोग्य खूप महत्त्वाचे आहे. ते जोपासले पाहिजे. क्षारपीडित जमिनीमध्ये सेंद्रिय पद्धतीने शेती करता येणार नाही. मृद आरोग्य टिकविण्यासाठी हय़ूमस, सेंद्रिय कर्ब, शेणखत, कोंबडी खत, हिरवळीच्या खतांचा वापर अपरिहार्य असतो. दहा गुंठय़ामध्ये प्रायोगिक शेती करून एकरी उत्पादनाची सरासरी सांगून शेतकऱयांना भ्रमिष्ट करू नये. 5-10 एकरमधले सरासरी उत्पादन सांगणे हिताचे ठरेल.
पिकांचे उत्पादन, संरक्षण आणि पशुधनाची काळजी हे कौशल्यच आहे. जनावरांच्या वजनावरून हिरवा चारा व वाळलेला चारा याचे निश्चित प्रमाण सांगणारा शेतकरीच कौशल्यवान शेतकरी असतो. दिवसभर जनावरापुढे चारा टाकणारा शेतकरी कौशल्यहीनच आहे. व्यवहारात व्यावसायिकता असावी. खरेदीदार, विपेते यांची चलाखी माहीत असावी. पणन व्यवहारातील कौशल्ये शेतकऱयांना अवगत असली पाहिजेत. वेळ, पैसा आणि श्रमाची बचत करून सर्व शेती व्यवहार सहज व सुलभ करणारा आणि पुढील-मागील सहसंबंध जपणारा हा ऍग्रीप्रन्युअर असतो.
पंजाब, हरियाणा राज्यातील भात व गव्हाच्या लागवडीला विरोध होऊ लागला आहे. कारण भू-जलस्तर सातत्याने घटत आहे. त्यामुळे या दोन पिकांव्यतिरिक्त अन्य पीक संरचना स्वीकारण्याची शिफारस केली जात आहे. कापूस, मका आणि बासमतीच्या लागवडीची शिफारस होत आहे. शेंगवर्गीय पिके, पीज, फवा पीज, कोबी, फ्लॉवर, कोलार्ड्स, कळे, कोहलरवी, मोहरी, ब्रोकोली, स्वीटकॉर्न, टर्निप्स अशा पिकांच्या लागवडीची शिफारस केली जात आहे. भरड धान्यांची लागवड (मिल्लेट) किफायतशीर आहे. शिवाय त्याच्या उपभोगाच्या प्रमाणात वाढ होत आहे. मिल्लेट पिकांना खूप कमी पाणी लागते. शिवाय त्याला निर्यात मूल्यदेखील प्राप्त होण्याची चिन्हे आहेत. दुष्काळ सोशिक रानभाज्या व पालेभाज्यांची लागवड अधिक दाम मिळवून देणारी आहेत. कॉर्न, बिन्स आणि स्कॅश ही त्रिसूत्री खूप फायदेशीर आहे.
शेतीच्या मशागतीपासून ते पिकांच्या काढणीपर्यंत अनेक तंत्राचा व यंत्राचा वापर केला जात आहे. कृषी रोबोटच्या साहाय्याने तपमान, आर्द्रता, एरियल इमेजीस, अचूक निदानाचे तंत्रज्ञान, रिमोट सेन्सिंग वगैरे तंत्रज्ञानाचा वापर करून शेती किफायतशीर बनविता येते. पर्यावरणीय समतोल साध्य होतो. रोबोटच्या साहाय्याने मृद आरोग्य, पाण्याचा वापर, रोगांचे निदान, पिकांचे आरोग्य व गुणवत्ता, खतांची मात्रा, उत्पादनाचा अंदाज, इत्यादी सेन्सरद्वारे व ट्रक्टर ऍक्सेसरीजद्वारे निर्धारित करता येते. पशुधनाचे आरोग्य, दुधाची गुणवत्ता, भविष्यातील रोग यांची अगोदरच जाणीव होऊ शकते. त्यामुळे आरोग्यदायी दूधव्यवसाय वृद्धिंगत होऊ शकतो. या क्षेत्रातून निर्यातक्षमता जास्त आहे.
मधमाशी व ड्रोन तंत्राच्या साहाय्याने अनेक अंदाज व आडाखे बांधता येतात. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाने ई-कॉमर्स व इलेक्ट्रॉनिक बौद्धिक तंत्राने कृषी पणन व्यवहारात खूप सुलभता आलेली आहे. असे तंत्रज्ञान केवळ अर्धा टक्क्मयापेक्षा कमी शेतकरी भारतात वापरतात. अदानीसारखे मोठे भांडवलदार या तंत्रज्ञानाचा वापर करतात. त्यांचे सफरचंद सर्वात महाग आहेत. (156 रु. किलो). अमेरिकेत 49 टक्के शेतकरी हे तंत्रज्ञान वापरतात. शेतीमध्ये संगणकाच्या वापराचे प्रमाण न्यू मेक्सिकोमध्ये केवळ 30 टक्के आहे तर कोलोरॅडोमध्ये 72 टक्के आहे.
मोबाईलवरून सिंचन यंत्रणे हाताळता येतात. त्यामध्ये टाईमरही बसविलेला असतो. अल्ट्रासाऊंड पद्धतीने पशुधनाचे आरोग्य तपासता येते. पीक सेन्सॉरच्या वापराने सर्व प्रकारचे पीकसंरक्षण करता येते. पुढील वाटचालीचेदेखील मार्गदर्शन होते. त्यामुळे कमी खर्चाची शेती करता येते. रिमोट सेन्सिंगने ऍल्गोरिधमच्या तंत्राने पर्यावरणीय माहिती मिळते. त्या माहितीचे डिकोडींग केल्यास योग्य निर्णयांची अंमलबजावणी होऊ शकते.
नॅनो टेक्नॉलॉजी आणि सिंथेटिक बॉयॉलॉजिने तर तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये क्रांतीच केली आहे. जेन एडिंगद्वारे पिकामध्ये हवे ते गुणधर्म, चव, स्वाद आणता येतात. त्यासाठी कॅस्पर कॅस-9 व 12 तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. 2030 पर्यंत कृषी तंत्रज्ञानामध्ये क्रांतीच घडणार आहे. असे सर्व प्रकारचे ज्ञान केवळ ऍग्रीप्रन्युअर आत्मसात करू शकतो. या ज्ञानातूनच शेतकऱयांची कौशल्ये वाढू शकतात. शेतकऱयांच्या प्रशिक्षणाला खूप प्राधान्य द्यावे लागेल. नाणेनिधीच्या गीता गोपीनाथन यांनीदेखील भारताला तसे सूचित केले आहे.
डॉ. वसंतराव जुगळे – 9422040684