प्रतिनिधी / सांगली
कोयना धरणातून सोडण्यात आलेले पाणी मंगळवारी सांगलीत पोहोचले. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आयर्विन पुल, सरकारी घाट, माई घाट तसेच सांगलीवाडी च्या बाजूला पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. येथील बंधार्यावरून पाणी वाहू लागले आहे. पाणी पातळीत वाढ झाल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.