भगवान श्रीकृष्ण सत्राजिताला स्यमंतकमणी परत देताना म्हणाले-तुम्ही सूर्यनारायणाचे अनन्य भक्त आहात. सूर्यनारायणाने प्रसन्न होऊन आपल्याला पूर्ण कृपेने प्रसाद म्हणून हा स्यमंतकमणी दिला आहे. ते रत्न तुमच्यापाशीच सफल होईल, ऐश्वर्य देणारे होईल. दुसऱयाच्या ताब्यात ते गेल्यास सूर्यनारायणाचा त्याच्यावर कोप होईल. पूर्वी जमदग्नीवर प्रसन्न होऊन स्वर्गलोकातील कामधेनू त्याच्या आश्रमात राहिली होती. ती कार्तवीर्याने अपहरण करून आपल्या राजधानीत नेली. त्यामुळे जमदग्नीचा पुत्र परशुराम संतापला आणि त्याने कार्तवीर्य व त्याच्या वंशजांची राख रांगोळी केली. हजारो क्षत्रियांना कंठस्नान घातले. देवताप्रसाद हा अशाप्रकारे इतरांना न लाभता उलट हानीकारक होतो. त्यामुळे तुम्हाला प्रसाद म्हणून लाभलेला स्यमंतकमणी तुमच्यापाशीच असू द्या. एवढे सगळे घडल्यानंतरही सत्राजितावरील विघ्न काही संपले नव्हते. पुढील कथा महामुनी शुकदेव वर्णन करतात ती अशी-शकुनिमंत्रें दुर्योधन । लाक्षागारिं पाण्डवनिधन । करितां विवरिं प्रवेशोन। गेले म्हणोन हरि जाणे । ऐसा विज्ञातार्थही हरि । तथापि मनुष्यनाटय़ानुकारी । प्रवर्तला वृधाचारिं। सर्वान्तरी सर्वग जो ।कुन्तीसहित पाण्डवांतें । लाक्षागारिं जाळिलियांतें । परिसोनियां श्रीकृष्णातें। परम दु:खातें मानिलें ।वसुदेवप्रमुख सभास्थानीं । परम शोकें रसरसूनी ।वृद्धकुळाचाराचरणीं । रामकृष्ण पाठविले। रत्नखचित रुक्मरथ । सुपर्णतालध्वजमंडित । सायुध सानुगपरिवेष्टित । कुरुविषयांतें पातले।यथाकुळोचित वृद्धाचारें । आप्त कौरव निजसोयरे । । शकुनि कर्ण दु:शासन । अपर गान्धारीनंदन । पुढें येऊन भेटले ।
दावूनियां मृषा शोक । विलाप करिती अधोमुख ।
अंतरवेत्ता यदुनायक । यथालौकिक संबोखी।तेथूनि उठिलियानंतरें । ज्यांचीं निष्कपटें अंतरें। त्यांप्रति जाऊनियां स्नेहभरें । भेटिजे यदुवीरें तें ऐक। इकडे शकुनीमामाच्या सल्ल्यानुसार दुर्योधनाने कुंतीसह पांडवांना ठार मारण्यासाठी वारणावर्तात त्यांना लाक्षागृहात राहायला लावले व रात्री त्या लाक्षागृहाला आग लावून दिली. पण पांडव व कुंतीमाता गुप्तपणे आधीच खोदून ठेवलेल्या विवरातून सुखरूपपणे पळाले. त्रिकालज्ञ असलेल्या भगवान श्रीकृष्णाला हे सारे ज्ञात होते. पण मानव देह धारण केलेल्या कृष्णाने आपल्याला हे माहिती आहे असे कुणाला भासू दिले नाही. कुंतीसह पांडव लाक्षागृहात जळून मेले अशी बातमी द्वारकेत येऊन पोहोचली. तेव्हा वसुदेवासह प्रमुख यादवांनी ज्ये÷ांच्या सांत्वनाकरिता बलराम व कृष्ण यांना हस्तिनापुरास पाठविले. रत्नखचित सुवर्णाच्या रथात शस्त्रसज्ज होऊन बलराम व कृष्ण बसून हस्तिनापुरात आले. कुळाचाराप्रमाणे वृद्ध आप्तांचे सांत्वन करायला ते तेथे आले होते. कौरवांच्या सभास्थानी दुर्योधन, शकुनी, कर्ण, दु:शासन व इतर गांधारीपुत्र त्यांना सामोरे गेले. पांडव गेल्याने दु:ख झाल्याचे सोंग करून ते सांभाळावया स्नेहादरें । परम ओसरें ते गेले ।जाऊनियां हस्तिनापुरा । वृत्तान्त जाणविला नृपवरा । कौरवीं सन्मानें मंदिरा । नेऊनि परिवारा राहविलें । सभास्थानीं दुर्योधन खाली मान घालून खोटा विलाप करू लागले. प्रत्येकाच्या मनात कोणती भावना आहे हे भगवंत जाणू शकत नाहीत काय? भगवंतानेही सर्व जाणून त्यांच्याशी तोंडदेखले भाषण केले.
ऍड. देवदत्त परुळेकर