ओटावा
कॅनडातील तीन महाविद्यालयात शिकणाऱया 2 हजार भारतीय विद्यार्थ्यांचे भवितव्य सध्या अंधारात सापडले आहे. सरकारने सदरची तीन महाविद्यालये दिवाळखोरीत निघाल्याची घोषणा केल्याने या महाविद्यालयांमध्ये शिकणाऱया भारतीय विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी राहिले आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी जस्टीन टुडो सरकारकडे आवाज उठवला आहे. त्यांच्यावर झालेला हा अन्याय सरकारने दूर करण्याची मागणी सदच्या विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. भारतातील विविध राज्यातील विद्यार्थी कॅनडामध्ये शिक्षणासाठी दरवषी येत असतात. कॅनडातील सीसीएसक्मयू, एम आणि सीडीइ कॉलेजिसवर दिवाळखोरीच्या कारणास्तव सरकारने बंदी लादली आहे. सदरच्या शिक्षण संस्थांना शैक्षणिक शुल्काच्या माध्यमातून लाखो डॉलर भारतीय विद्यार्थ्यांनी दिले आहेत. सध्या शैक्षणिक शुल्काच्या नुकसानीसोबतच शैक्षणिक वर्षाचे नुकसानही भारतीय विद्यार्थ्यांना सोसावे लागत आहे. शैक्षणिक भवितव्याचा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. सदरच्या विद्यार्थ्यांनी यासंदर्भात निदर्शने करत मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. शिक्षणाचे वर्ष पूर्ण करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.