25 हजार टन आंब्याच्या खरेदीचा प्रश्न
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कॅनिंगसाठी आंबा खरेदी करणाऱया मोठ-मोठय़ा उद्योगांच्या प्रतिनिधींना क्वॉरंटाईन केल्याशिवाय रत्नागिरी जिह्यात प्रवेश देण्यास प्रशासनाने नकार दिल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. सुमारे 25 हजार टन आंब्याची खरेदी दरवर्षी रत्नागिरी-सिंधुदुर्गातून होत असते. ती अडचणीत आल्याने बागायतदार व कॅनिंग उद्योगासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
‘मदर डेरी’ या नामवंत उद्योगाचे प्रतिनिधी अमोल महांगडे यांनी सांगितले की, कोकणातील विविध ठिकाणाहून आम्ही आंबा खरेदी करतो. पावस, जळगाव, नाशिक, कराड, पुणे, अहमदनगर या ठिकाणी त्यावर प्रक्रिया करतो. आमच्या कंपनीचे सुमारे 15 जण रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यात आंबा खरेदीसाठी सुमारे महिनाभर मुक्काम ठोकून असतात. विविध आंबा उत्पादक शेतकऱयांचा आंबा खरेदी करण्यासाठी या प्रतिनिधींची गरज असते.
ते म्हणाले, वेंगुर्ले, देवगड, रत्नागिरी या ठिकाणी आम्ही आंबे खरेदी करत असतो. पावस येथील कोकण मँगो या आंबा प्रक्रिया केंद्रात आम्ही काही आंबा प्रक्रिया करत असतो. आंबा योग्यवेळी व योग्य प्रतीचा खरेदी केला जावा, असा आमचा प्रयत्न असतो. मुंबई व अन्य बाजारात भाव कमी मिळू लागल्यावर शेतकरी मोठय़ा प्रमाणात त्यांचा माल पॅनिंगकडे वळवतात. शेतकऱयांना त्यामुळे किमान चांगला भाव मिळतो. कॅनिंग उद्योगासाठी आंब्याची खरेदी थांबली तर आंबा उत्पादकांना किमान भाव मिळणे अवघड ठरेल. तसेच आमच्यासारख्या अन्य प्रक्रियादारांनाही माल मिळणे कठीण होईल.
ते पुढे म्हणाले, वाशी फळ बाजारात शासनाने घालून दिलेले निकष पाळून फळ व्यापाराचा कारभार चालतो. आम्हीही आरोग्यविषयक सर्व शासकीय निकष पाळू. आम्हाला आंबा खरेदी करण्यासाठी प्रशासनाचे अडथळा आणू नये. सध्या प्रशासनाचे लोक आम्हाला 14 दिवस क्वॉरंटाईन रहा, असे सांगत आहेत. हंगाम 8 दिवसांवर आला. यामुळे 14 दिवस क्वॉरंटाईन राहणे आम्हाला शक्य नाही. आंबा खरेदी हा यावर्षी मोठा अडचणीचा मुद्दा झाला आहे. यातून प्रशासनाच्या वरीष्ठ अधिकाऱयानी मार्ग काढावा, अशी अपेक्षा आहे. यामुळे शेतकरी व प्रक्रियादार उद्योजक अशा दोघांचीही सोय होईल.
दरवर्षी कोकणात मोठय़ा प्रमाणात पॅनिंगसाठी आंबा खरेदी होत असते. अमराना फुड्स प्रायव्हेट लि., सह्याद्री फार्म्स लि., अलाना सन्स लि., जैन इरिगेशन लि., प्रेश क्रॉप प्रुट्स लि., रॉयल फुड्स, एक्झॉटिक पुट्स अशा अनेक नामवंत उद्योगांकडून आंबा खरेदी होत असते. सुमारे 25 हजार टन आंबा रत्नागिरी, सिंधुदुर्गातून प्रक्रिया केला जातो. यावर्षी हा उद्योग अडचणीत आला आहे.
.