कोविडसंसर्गामुळे चारपैकी तीन युवकांच्या मेंदूच्या क्षमतेवर परिणाम झाल्याचे एका अभ्यासातून आढळून आले आहे.
- कोरोनामुक्त झाल्यानंतर दोन महिन्यांपर्यंत 77 टक्क्यांहून अधिक नागरिकांना मानसिक आजाराचा त्रास सहन करावा लागला. विशेष म्हणजे यात 50 पेक्षा कमी वयोगटातील लोकांची संख्या अधिक आहे.
- युरोपीय ऍकडेमी ऑफ न्यूरॉलॉजीच्या सातव्या परिषदेत सादर केलेल्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे.
- मिलान येथील विद्यापीठाचे प्रोफेसर आणि या शोधाचे प्रमुख मासिमो फिलिष्पि यांनी म्हटले, की कोरोनाचा मानसिक आणि व्यवहाराशी निगडीत असलेल्या समस्येचा थेट संबंध आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतरही अनेक महिन्यांपर्यंत मानसिक समस्या राहू शकतात.
- डॉ. माट्टिया पोझाटो यांच्या मते, कोरोनामुक्त झाल्यावर पाच ते दहा महिन्यानंतरही 53 पैकी 77.4 टक्के लोकांत किमान एका प्रकारच्या मनोविकाराचा त्रास असल्याचे आढळून आले. 46.3 टक्के लोकांत तीन प्रकारच्या मानसिक आजाराची लक्षणे दिसली.
- कोविडमुक्त झाल्यानंतर 90 टक्के लोकांत पोस्ट कोविडचे लक्षणे दिसतात. त्यात बहुतांश लक्षणे हे मेंदूशी संबंधीत आहेत.
- या अहवालात म्हटले की, कोरोना संसर्ग झाल्यानंतर व्यक्तीचे एक्झिक्यूटिव्ह फंक्शन (स्मरणशक्ती आणि विचाराची शक्ती) यावर खूपच परिणाम होतो. त्यामुळे या मंडळींना ध्यानधारणा करताना, योजना तयार करताना, एखाद्या गोष्टी लक्षात ठेवताना अडचणी आल्या आहेत.
- तज्ञांच्या मते, संसर्गामुळे मेंदूच्या कार्यप्रणालीत अडथळे येतात आणि त्यामुळे विचार क्षमता आणि आकलन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
- करोना रुग्णांत कालांतराने रक्ताच्या बारीक गाठी होत असल्याचे आढळून आले आहे. शरिरातील एका भागातून दुसर्या भागाकडे तसेच मेंदूपर्यंत या गाठी पोचू शकतात. या कारणामुळे व्यक्तीच्या वागण्यात बदल पाहण्यास मिळतो.
- संशोधनानुसार कोरानातून बरे झाल्यानंतर दोन महिन्यांनी लोकांचा एमआरआय करण्यात आला. त्यात 50 टक्के लोकांची आकलन क्षमता कमी झाल्याचे निदर्शनास आले. तसेच सहा टक्के लोकांना अंतर, खोलपणा, रंग याचा अंदाज बांधण्यास अडचणी येऊ लागल्या.
- 25 टक्के लोकांत ही सर्वच लक्षणे दिसून आली. अन्य एका सर्वेक्षणात कोरोनातून बरे झालेले लोक दहा महिन्यानंतरही नैराश्याच्या गर्तेत असल्याचे आढळून आले.