पारंपरिक शिमगोत्सव बंद,होळीवरही लादले निर्बंध, गोमंतकीयांना 144 चा धाक,पर्यटकांना मात्र सर्वकाही खुले
प्रतिनिधी / पणजी
राज्यात 144 कलम लागू असतानाही रंगपंचमीच्या नावाखाली किनारी भागात रविवारी, सोमवारी जंगी पाटर्य़ांचे आयोजन करण्यात आले. हजारोंच्या संख्येतील या जमावांमध्ये कोरोना मार्गदर्शक तत्वे आणि 144 कलमाचा फज्जा उडाला. कॅसिनोमध्ये अगोदरच कोरोनाचे रुग्ण सापडलेले असतानाही कॅसिनोंच्या ठिकाणी हजारो पर्यटकांच्या झुंडी सायंकाळपासून पहाटेपर्यत असतात. पोलीस त्यांच्यावर कोणतीच कारवाई करत नाहीत. त्यामुळे हे 144 कलम केवळ आपल्या घरीच, किंवा वाडय़ावर होळी करणाऱया गोमंतकीयांनाच आहे काय?, असा संतप्त सवाल रविवारी, सोमवारी जनसामान्यांमधून उपस्थित करण्यात आला. विरोधकांनी सरकारच्या या दुटप्पी धोरणावर तीव्र टीका केली.
राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन व्यवस्थित होत नसल्याचेही अढळून आले आहे. किमान सामाजिक अंतर राखावे या हेतूने राज्यात 144 कलम लागू केले आहे. मात्र 144 कलमाचाही फज्जा उडाला असून सरकार कोणतीही कारवाई करण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. राज्यात सामान्य गोमंतकीयांना कायदा आणि पर्यटकांना खुले रान, अशी सरकारची भूमिका आहे काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला. सरकारच्या या भूमिकेबाबत विरोधक विधानसभेत आवाज उठविणार आहेत.
पारंपरिक शिमगोत्सव बंद,मात्र पर्यटकांच्या पाटर्य़ा सुरुच
काल सोमवारी राज्यभरात मोठय़ा उत्साहाने रंगपंचमी साजरी करण्यात आली. स्थानिकांनी आपल्या गावात किंवा वाडय़ावर कुटुंबासमवेत रंगपंचमी साजरी केली. कोरोनाच्या भितीने आपल्या उत्साहाला सावरुन धरुन पारंपरिक उत्सव साजरा केला. मात्र किनारी भागातील हॉटेल्स तसेच उघडय़ा जागांवर पर्यटकांनी पाटर्य़ां करून धुमाकूळ घातला. अशा पाटर्य़ा गोव्यातील अनेक किनारी भागांमध्ये रविवार, सोमवारी चालू होत्या. एका बाजूने कोविड सारख्या महासंकटाची सावळी पुन्हा गडद होत असताना दुसऱया बाजूने पर्यटक म्हणून गोव्यात आलेल्या परप्रांतीयावर कोणतेच निर्बंध नसल्याने धोका वाढलेला आहे. सरकारने गोव्याचा पारंपरिक शिमगोत्सव बंद केला मात्र बाकी सर्व कार्यक्रम, पाटर्य़ा सुरु आहेत.
मातृछाया, हॉटेल्सवर होणारी कारवाई कॅसिनोवर का होत नाही?
पॅसिनोबाबत तर सरकारला पुर्वीपासूनच प्रेम आहे. आता तर कॅसिनोमध्ये कोरोनाचे रुग्णही सापडलेले आहेत, तरीही सरकारचे कॅसिनोंवरील प्रेम तसूभरही कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. फोडा येथील मातृछायेत कोरोना बाधित आढळून आल्यावर मातृछाया बंद करण्यात आले होते. मडगाव, पणजी येथील काही हॉटेलचे कामगार बाधित झाल्यामुळे ती हॉटेल्सही बंद करण्यात आली होती. मात्र पॅसिनोत कित्येक कामगार कोरोना बाधित झाले, तरीही त्या पॅसिनोवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. तो कॅसिनो का बंद करण्यात येत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
किनारी भागांतील पाटर्य़ांमागे भाजप : गोवा फॉरवर्ड
कोविड-19 रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याचे कारण पुढे करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिमगोत्सव मिरवणुका रद्द केल्या, राज्यात 144 कलम लावले, तरी किनारपट्टी भागांमध्ये पाटर्य़ांची रेलचेल मात्र बिनधास्तपणे सुरू आहे व अशा पाटय़?ा& बंद पाडू नयेत म्हणून भाजपाचे नेते सरकारी अधिकाऱयांवर कारवाई न करण्यासाठी दबाव टाकत आहेत, असा आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी केला आहे. कामत यांनी यासंदर्भात ट्विट केले असून भाजप सरकारवरील त्यांच्या टीकेचा रोख स्पष्टपणे दिसून येत आहे. सरकार दुटप्पी भूमिका घेत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वाढत्या कोविड रुग्णांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. मात्र सरकारने कोविडच्या फैलावाला आळा घालण्यासाठी आवश्यक कृती करणाऱया अधिकाऱयांची अडवणूक करणे योग्य नसल्याचे कामत यांनी म्हटले आहे.
अशी प्रकरणे अधिकाऱयांना नंतर शेकणार
अधिकाऱयांनी या दबाव आणणाऱया भाजप नेत्यांचे न ऐकता कोविड नियमावलीचे उल्लंघन करणाऱयांवर आवश्यक कायदेशीर कारवाईचा बडगा उचलावा व कोणाच्या दबावाखाली वाकू नये, असे त्यांनी म्हटले आहे. अन्यथा अशी प्रकरणे नंतर अधिकाऱयांवर शेकणार आहेत. कारण अलीकडचे उदाहरण पाहिल्यास पालिका निवडणुकीकरिता दबाब टाकून स्वतःला पाहिजे तसे आरक्षण करून घेणारे नंतर उच्च न्यायालयात तसेच सर्वोच्च न्यायालयात अधिकाऱयांच्या मदतीला आले नव्हते. त्यामुळे पालिका संचालकांना आपली बाजू एकटय़ानेच सांभाळावी लागली, याकडे कामत यांनी लक्ष वेधले आहे.
कायद्याची धिंड काढणारा नवा उपक्रम : फळदेसाई
राज्यात कोरोना वाढला असे सांगत 144 कलम लावण्यात आले. मात्र सरकारी कार्यक्रम विना व्यत्यय सुरू आहेत. 144 कलमाच्या नावे कायदय़ाची धिंड काढण्याचा नवा उपक्रम मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सुरू केला असल्याची प्रतिक्रीया गोवा सुरक्षा मंचाचे अध्यक्ष नितिन फळदेसाई यांनी व्यक्त केली आहे.
यासंबंधी वास्कोत घेतलेल्या पत्रकार परिषदेत गोसुमंने सरकारच्या 144 कलमाच्या निर्णयावर जोरदार टीका केली. यावेळी गोसुमंचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य राजू वेलिंगकर, पदाधिकारी शेखर पालयेकर व समीर कुटवाळकर उपस्थित होते. कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस पुन्हा वाढत आहेत असे सांगत राज्यात 144 कलम लावून आरोळी ठोकण्यात आली. मात्र, सर्वत्र कॅसिनो, बीच पाटर्य़ासारखे कार्यक्रम बिनबोभाट सुरू आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न पडावा अशी नाजूक अवस्था आहे. स्वतः मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिवसभरात अनेक सार्वजनिक कार्यक्रमाना उपस्थित राहून कहर केला आहे. सर्व सामान्य जनतेसाठी एक कायदा, कॅसिनोवाल्यांना त्यांच्या सोयीनुसार कायदा, बीच पाटर्य़ांना 144 कलम असताना परवानगी कशी मिळते, सरकारने नेमके काय चालवले आहे हे सरकारला तरी कळतेय काय असा प्रश्न फळदेसाई यांनी उपस्थित केला आहे.
बीच पार्टी, कॅसिनो याना कायदा लागत नाही, पण शिवजयंती उत्सव रद्द करून आम्ही कायदय़ाचे पालक आहोत हे सिध्द करण्याचा सावंत सरकारचा प्रयत्न वाखाणण्या सारखा आहे. हिंदूंच्या सर्व सणांना 144 कलम लावायचे, इतरांना मात्र अभय असे म्हणत हा दृष्टीकोन सरकारने बदलला नाही तर आमच्या पध्दतीने काम करू मात्र, अन्याय कदापीही सहन करणार नाही असे राजू वेलिंगकर म्हणाले.