वेंगुर्ले (वार्ताहर)-
शब्दनाद साहित्य समुह अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या `दुरावा’ या विषयावरील राज्यस्तरीय अलक लेखन स्पर्धेत (अति लघु कथा ) सुरंगपाणी केंद्रशाळेतील उपक्रमशिल शिक्षिका लेखिका तसेच संवेदनशील कवयित्री सौ शामल मांजरेकर-पिळणकर यांच्या रचनेला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.
या स्पर्धेचे परीक्षण समुह संस्थापिका दिपालीताई गुरव यांनी केले. आयोजकांनी ऑनलाईन सन्मानपत्र देऊन गौरव केला. यापूर्वीही सौ. शामल मांजरेकर यांच्या चित्रकाव्य, चारोळय़ा, दशपदी, उखाणे, अष्टाक्षरी, अभंग अशा विविध रचनांना राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट मानांकने प्राप्त झालेली आहेत. या घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरातून सौ. शामल मांजरेकर यांचे अभिनंदन होत आहे .