नजीकच्या काळातही भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी भारतीय जनता पक्षच असेल. भाजप जिंकला काय किंवा हरला काय तो या पुढची काही दशके कुठेही जाणार नाही. लोक भाजपला ताबडतोब फेकून देतील असे राहुल गांधी यांना वाटत असेल पण तसे होणार नाही. या निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या गोव्यातील खाजगी बैठकीत केलेल्या वक्तव्याची चित्रफित बाहेर पडली आहे. अर्थातच हीसुद्धा एक रणनीती असू शकते. प्रशांत किशोर वास्तववादी आहेत. भारतीय राजकारणात आजच्या नेत्यांना झटपट निर्णय हवे असतात तसा आग्रह प्रशांत किशोर सुद्धा धरतात. त्यामुळे त्यांचे मोदींशी फार काळ पटले नाही. नितिशकुमार यांच्याकडे ते फार काळ राहिले नाहीत. राहुल गांधींशी त्यांचे जमले नाही. ठाकरे यांनी निवडणूक काळाच्या पलीकडे त्यांच्या रणनीतीची अंमलबजावणी केली नाही. शरद पवारांना त्यांची गरज वाटली नाही. पण त्यांच्या मदतीने अनेकांना सत्तेवर येण्यास किंवा स्वतःचे नेतृत्व सिद्ध करण्यास फायदा झाला. बंगालात ‘खेला होबे’ने ते अधिक दृढ झाले. अर्थातच रणनीती हा एक भाग आहे आणि नेतृत्व, त्याची मानसिकता, त्यांची कष्ट करण्याची तयारी आणि त्याच्या पाठीशी असणारे बळकट संघटन, ते देत असलेला विचार, पर्याय या जोरावरच निवडणुकांमध्ये यश मिळत असते. केवळ हवेवर आणि लाटेवर स्वार होऊन कधी फार पुढे जाता येत नाही. त्यादृष्टीने भारतीय राजकारण बऱयाचदा बेभरवशाचे वाटत असले तरी त्यामध्ये प्रत्येक शक्तीला भान आणि बळकटी देण्याचे काम भारतातील जनतेने अत्यंत सामंजस्यपणे वेळोवेळी करून दाखवले आहे. ही जनता अचानक जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे कोणाला डोक्मयावर बसवून घेत नाही आणि कोणाला अचानक पायदळी तुडवत नाही. प्रत्येकाला संधी आणि इशारे देत देत अस्पष्ट किंवा स्पष्ट बहुमत देत असते. त्यामुळेच 90 च्या दशकात डावे, भाजप यांना संधी आणि कांग्रेसला आपटी मिळते. नंतर तीच जनता अडवाणींना अपयश तर सोनियांना अस्पष्ट जनादेश देते. डाव्यांचीही परीक्षा पाहते. काँग्रेस उन्मादी होताच मोदींना साथ देते. पण मोदींसारखा देशात जनमत असणारा प्रभावी नेता असतानाही महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा, कर्नाटक आणि खुद्द गुजरातमध्ये जनतेने भाजपला अक्षरशः झुंजवले. निराळय़ा खटपटी कराव्या लागल्या. त्यामुळे आज राज्यांमध्ये आपलेच वातावरण असणार, देशात मोदी आणि भाजप विरोधात अचानक फार मोठा विद्रोह उफाळून येईल असे मानणाऱयांना स्वप्नातून जागे करण्याचे काम प्रशांत किशोर यांनी केले आहे. यापूर्वी बंगालच्या निवडणुकीतही त्यांनी भाजपचे आव्हान किती असेल ते स्पष्ट केले होते. त्यावेळेला भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील काही मंडळींना हर्षवायू झाला. त्यांनी एका वेबिनारमध्ये प्रशांत किशोर जे बोलले तो ऑडिओ व्हायरल केला. काही प्रसिद्ध अँकरनी तर ताबडतोब किशोर यांना स्टुडिओत बोलावून चर्चाही सुरू केली. तेव्हा प्रशांत किशोर यांनी बंगालमध्ये एक कोटी हिंदी भाषिकांची मते, दलित मते आणि सर्वच राजकीय पक्षांचे मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण यामुळे भाजपचे आव्हान आहे पण लोकसभेला मिळाले तसे यश बंगालच्या निवडणुकीत मिळणार नाही. पूर्वीपेक्षा सरस कामगिरी केली तर आपण राजकारण सोडू असे खुले आव्हान दिले. त्यानंतर ममता बॅनर्जींच्या रणनीतीत बदल आणि आक्रमकपणा दोन्ही वाढला. स्तोत्र पठण करून दाखवतानाच बंगाली संस्कृतीच्या लढाईला बिंबवले. वास्तवादी राजकारणाची अपेक्षा ते करत असतात. ज्यांना ते पटते ते लोकनेते आपल्या भूमिकेत सुयोग्य बदल करून यशस्वी होतात. उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये त्यांचीच रणनिती पाच वर्षानंतर प्रियंका गांधींनी राबवण्यास सुरुवात केली आहे. युवकांना राजकारणात अधिक स्थान देणे, महिला, दलित आणि ओबीसी, अल्पसंख्यांक यांना पुरेसे प्रतिनिधित्व आणि बहुसंख्यकांनाही सुखावणारी धोरणे-घोषणा हा त्यांचा रणनीतीचा साधा आग्रह असतो. नोकरी, रोजगार, शेतकऱयांना भाव, कल्याणकारी योजना आणि भविष्याच्यादृष्टीने पक्षाचा काय अजेंडा आहे तो नेत्यांनी निवडणुकीत सर्व भागात स्वतः फिरून जनतेसमोर मांडावे, इतरांपेक्षा हटके प्रकल्प लोकांसमोर ठेवावेत असा ते आग्रह धरतात. सर्व राजकीय पक्षांनी युवापिढी शहरात आपल्या पक्षाची धुरा द्यावी ही त्यांची अपेक्षा मात्र सर्वच पक्षात धुडकावून लावली जाते आणि त्यांचे बिनसते हे विशेष! भ्रष्टाचार आणि तेच ते नेते हा जनतेच्या तिटकार्याचा प्रमुख मुद्दा ते मानतात. त्यातून पक्षात हुकूमशाहीचे दर्शन घडू लागते आणि लोक दूर जातात. हे ते काँग्रेसला सांगत आहेत. भाजप देशाच्या केंद्रस्थानी राहील हे सांगताना तो सदासर्वकाळ सत्तेवर असेल असे नाही हेही ते स्पष्ट करतात. तरीही भाजप हा सर्वात मोठा पक्ष बनतो हे वास्तव ते मांडतात सर्वांनाच भानावर आणू पाहतात. भाजपचे यश आज दिसत असले तरी बाळासाहेब देवरस यांची दूरदृष्टी त्यामागे आहे. 1952 साली जनसंघाने निवडणूक हरल्यानंतर डोक्मयावर आलेले कर्ज, संघ कार्य थांबून सात वर्षे शेती करावी लागली. पण विरोध आणि आंदोलन लोक हसले तरी चालू ठेवले. आणीबाणीनंतर जनता पार्टी, निवडणूक लढण्यास अनुत्सुक विरोधकांना जयप्रकाशजींद्वारे पराभूत मानसिकतेतून बाहेर आणले. इंदिरा विरोधात लढलो तर जनता आपल्याला पर्याय मानेल हे पटवले. स्वविचाराचे 93 खासदार असून तीनच मंत्रीपदे घेऊन वाजपेयी, अडवाणींची राष्ट्रीय प्रतिमा तयार केली. दुहेरीनि÷sच्या मुद्यावर बाजूला पडल्यानंतर 1984 साली भाजप हा गांधीवाद मान्य असणारा पक्ष जाहीर केला. इंदिरा गांधींच्या शांती यात्रेला गुंगारा देत राम मंदिर आंदोलन सुरू केले. छोटय़ा जातीचे राज्यांतील नेते मोठे केले. मित्र जोडले. वास्तवदर्शी प्रयत्नांची ही 1952 ते 2014 प्रदीर्घ वाटचाल आहे. तरीही मुस्लिमांना राष्ट्रीय प्रवाहाचे आवाहन आणि ओबीसी आरक्षण मान्य करणे यामुळे भाजपा मध्यवर्ती भूमिकेत राहील. वास्तवाला स्विकारतील तेच पर्याय ठरतील हेच ते सांगत आहेत.
Previous Articleप्राणिक क्रिस्टल हीलिंग
Next Article ‘पॉवरस्टार’ची एक्झिट
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.