प्रतिनिधी / सांगली
केंद्र शासनाने पुन्हा एकदा प्रादेशिक व्यापार आर्थिक भागिदारी करार (आरसीईपी) करण्याचा घाट घातला आहे. केंद्राच्या यासह अन्य शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ देशातल्या 265 शेतकरी संघटनांच्या वतीने येत्या आठ जानेवारी रोजी ग्रामीण भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवरही महाराष्ट्रातही कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. दरम्यान, कबूल केल्याप्रमाणे राज्य शासनातील तीनही पक्षांनी शेतकऱयांचा सातबारा कोरा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आरसीईपी करारावर सही करणार होते. मात्र शेतकरी संघटनांनी विरोध केला. त्यामुळे त्यांनी या करारावर सही केली नाही. परंतु आता पुन्हा हालचाली सुरु झाल्या आहेत असे सांगत शेट्टी म्हणाले, हा करार झाल्यास देशातील शेतकरी उद्धवस्थ होईल. चीन, ऑस्ट्रेलिया, मलेशिया यासह अन्य देशामधून येणाऱया तांदूळ, दूध, पामतेलसह अन्य शेतीमालामुळे शेतकऱयांसह उद्योग संकटात येतील. यासह केंद्राच्या अन्य शेतकरी विरोधी धोरणांना देशतील 265 शेतकरी संघटनांनी कडवा विरोध केला आहे. या संघटनांनी येत्या आठ जानेवारी रोजी ग्रामीण भारत बंदची हाक देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामीण महाराष्ट्रातही कडकडीत बंद पाळण्यात येईल.
सातबारा कोरा करा
शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीत शेतकऱयांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा केली होती. ठाकरे सरकारने दोन लाखापर्यंतची कर्जमाफी केली आहे. मात्र यामुळे शेतकऱयांना दिलासा मिळालेला नाही. शेतकऱयांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकार बदलले पण †िदलासा मिळत नसल्याने केवळ नोव्हेंबर महिन्यात 300 हून अधिक शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱयांना सरकारबाबत विश्वास वाटत नसल्यानेच आत्महत्या थांबायला तयार नाहीत असे सांगत शेट्टी म्हणाले, टाकरे सरकारने वाटप बाजूला ठेवून कबूल केल्याप्रमाणे आधी शेतकऱयांचा सातबारा कोरा करावा. वीज बिल माफ करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.
एफआरपी अधिक दोनशेवर ठामच
ऊस दर परिषदेत स्वाभिमानीने एफआरपी अधिक दोनशे रुपयांची मागणी केली होती. यावर आजही ठाम असल्याचे सांगत शेट्टी म्हणाले, महापूर, अतिवृष्टीमुळे ऊस उत्पादकांचे नुकसान होऊ नये म्हणून आंदोलन शिथील केले आहे. याचा फायदा कारखानदारांनी घेऊ नये. आतापर्यंत बहुतांशी कारखानदारांनी एफआरपीप्रमाणे बिले देण्यास सुरवात केली आहे. म्हणून शांत बसणार नाही. उर्वरित दोनशे रुपयेही कारखानदारांच्याकडून वसूल करणार आहे. दरम्यान महापुरात नुकसान झालेला ऊस तात्काळ तोडण्याची ग्वाही कारखानदारांनी दिली होती. यामध्ये कुचराई झाल्यास संबंधित कारखान्यांना सोडणार नाही, असा गर्भीत इशाराही शेट्टी यांनी दिला. यावेळी वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, महेश खराडे आदी उपस्थित होते.
काम करा, वाटप बाजूला ठेवा
शासनाने आता काम केले पाहिजे. पण त्यांचा वाटपावरच बराच खल सुरु आहे. यामुळे शेतकऱयांना सरकारबाबत विश्वास नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान मंत्रीपदासाठी नाव चर्चेत असताना का डावलेले असे विचारले असता, शेट्टी यांनी याबाबत थेट बोलण्यास टाळले. सरकार कोणाचेही असो शेतकऱयांच्या प्रश्नांवर मागे हटणार नाही, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.