मायावतींचे केंद्र सरकारला आवाहन
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
कोरोना लस निर्मीती पासून ते लसीकरण होईपर्यंत अनेक वाद – विवाद, आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या याचा दुष्परिणाम देशातील जनतेवर झाला आहे. पण आता वेळ आहे ती लसीकरणावरुन होणाऱ्या वादाला पुर्णविराम देत जनतेचे लसीकरण अधिक – अधिक करण्याची, असे आवाहन बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी केले आहे.
भारता सारख्या ग्रामीण बहूल देशात लसीकरण अभियान राबवण्याची आवश्यकता आहे. तसेच वैज्ञानिक आणि आरोग्य विषयक घटकांना यासाठी प्रोत्साहीत करणे आवश्यक आहे. लसीकरणाचे फायदे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, बसपा केंद्र व सर्व राज्य सरकारांकडे मागणी करीत आहे की, मूलभूत आरोग्य सेवा अधिक मजबूत करा.” असे ही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये मायावती यांनी म्हटले आहे.