ऑनलाईन टिम : नवी दिल्ली
नरेंद्र मोदी सरकारने गुरुवारी जाहीर केले की मागील काही वर्षानंतर नागालँड, आसाम आणि मणिपूरमधील “सुधारलेली सुरक्षा परिस्थिती आणि ईशान्येतील वेगवान विकास यामुळे सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (AFSPA) अंतर्गत येणारी क्षेत्रे कमी करत आहोत.
गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटद्वारे ईशान्येतील महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल घोषणा केली. ते म्हणाले, “हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने नागालँड, आसाम आणि मणिपूर राज्यांमधील अनेक दशकांनंतर AFSPA अंतर्गत येणारी अशांत क्षेत्रे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.”
गृहमंत्री शहा यांनी नमूद केले की AFSPA अंतर्गत क्षेत्रे कमी करणे हे ईशान्येकडील बंडखोरी समाप्त करण्यासाठी आणि चिरस्थायी शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोदी सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि सुधारित सुरक्षा परिस्थिती आणि साधलेल्या वेगवान विकासाचा परिणाम आहे.