प्रतिनिधी/ मंडणगड
निसर्ग चक्री वादळाचा तडाखा तालुक्यातील सर्वच गावांना कमी अधिक प्रमाणात बसलेला असताना लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणांचा फोकस तालुक्यातील आंबडवे, वेळास, व शिगवण या केवळ तीन गावांवरच अधिक असल्याची गंभीर बाब पुढे आली असून तालुक्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेल्या काही दिवसात तालुक्याची वारी केलेल्या डझनभर मंत्री आमदार खासदार यांचा ओढा कमी अधिक प्रमाणात या तीन गावांकडे असल्याने अन्य गावातील ग्रामस्थांमध्ये सध्या तीव्र संताप व्यक्त केला जात असून तालुक्यात सर्व गावांचे कमी अधिक प्रमाणात वादळामुळे नुकसान झालेले असल्याने या तीन गावांचेच नुकसान सर्वाधीक आहे का अन्य गावांचा नुकसान नाही का असा उद्विग्न सवाल या गावातील ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे. या परिस्थितीत आता केंद्राची विविध खात्याच्या अधिकाऱयांची भर पडणार आहे. निसर्ग चक्रीवादळाने केलेल्या नुकसानाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक बुधवारी 17 जून 2020 रोजी तालुक्याचा दौरा करणार आहे यात बुधवार 17 जुन 2020 रोजी सकाळी 09.00 वाजता महाड येथून मंडणगडकडे प्रयाण. सकाळी 10.00 वाजता मंडणगड, जि. रत्नागिरी येथे आगमन. सकाळी 10.30 वाजता आंबडवे येथे आगमन व नुकसानीची पहाणी. सकाळी 11.00 वाजता शिगवण येथे आगमन व नुकसानीची पहाणी. सकाळी 11.55 वाजता केळशी येथे आगमन व नुकसानीची पहाणी असा दौरा असून दौयामुध्ये केंद्रीय पथकाचे प्रमुख श्री. रमेश कुमार गांता (भाप्रसे), सहसचिव,(?डमिनीस्ट्रशन आणि सीबीटी)एनडीएमए, एमएचए, नवी दिल्ली असून त्यांच्यासोबत श्री. आर.बी. कौल,सल्लागार, वित्त मंत्रालय (खर्च), नवी दिल्ली, श्री. एन.आर.एल.के. प्रसाद,संचालक, ऊर्जा मंत्रालय, सीईए, नवी दिल्ली, श्री.एस.एस.मोदी, उपसचिव, ग्रामीण विकास मंत्रालय, नवी दिल्ली, श्री. आर.पी. सिंग, संचालक, कृषी मंत्रालय, श्री. आंशुमली श्रीवास्तव, मुख्य अभियंता, विभागीय कार्यालय, रस्ता वाहतूक मार्ग विभाग, मुंबई हे अधिकारी सहभागी असणार आहेत. तालुक्यातील पंचवीसहून अधिक गावे पुर्णपणे नुकसानग्रस्त झाली आहेत घरे बागायती शेती भातशेतीच्या जमीन, यांची झाडे पडून मोठे नुकसान झाले आहे बहुतांश गावातील घरांची छप्परे व इमारती यांचे मोठे नुकसान झाले आहे पावसाळ्याकरिता साठवून ठवलेल्या अन्नधान्याची मोठी नसाडी झाली आहे असे असताना प्रशासनाच्या फोकस तीन गावावरच दिसून येतो नुकसानीचे पंचनामे सुरु होऊन आठ दिवसांचा कालावधी लोटल्यावरी प्रशासनाकडून नुकसानीसंदर्भात दिली जाणारी माहीती विर्पयस्त असल्याची टिका सातत्याने सर्वच स्तरातून होत आहे. प्रशासकीय पातळीवर वरिष्ठ पातळीवर नुकसानीची यथायोग्य आकडेवारी दीली जात नसल्याची भिती तालुकावासीयांमधून व्यक्त करण्यात येते असून निदान केंद्रांच्या टिमने तरी ग्राऊंड लेवलवर उतरून शक्य असल्यास तालुक्यातील सर्व गांवाचा पहाणी दौरा करावा वेळेअभावी ते शक्य नसल्यास तालुक्यातील अधिकाधीक गावे पंचायत समिती गट जिल्हा परिषद गण अथवा भौगोलीक परिस्थितीनुसार सर्व विभागांतील किमान प्रातिनिधी पाच गावांना भेटी देऊन परिस्थितीचे अवलोकन करावे अशी मागणी केद्गांच्या समितीच्या दौयाचेनिमित्ताने तालुक्यातून सर्वच स्तरातून पुढे येत आहे.