प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हयात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी केंद्रीय पथक बुधवारी दाखल होत आहे. वादळामुळे मोठे नुकसान झालेल्या मंडणगड व दापोली तालुक्याचा हे पथक दौरा करून पहाणी करणार आहे.
एनडीएमए, एमएचएचे सहसचिव (ऍडमिनीस्ट्रशन आणि सीबीटी) रमेश कुमार गांता (भाप्रसे) हे या केंद्रीय पथकाचे नेतृत्व करणार असून त्यांच्यासोबत अर्थमंत्रालयाचे सल्लागार आर.बी. कौल, उर्जा मंत्रालयाचे संचालक एन. आर. एल. के. प्रसाद, ग्रामीण विकास मंत्रालयचे उपसचिव एस. एस. मोदी, कृषी मंत्रालयाचे संचालक आर.पी. सिंग व रस्ता वाहतूक मार्ग विभाग, मुंबईचे मुख्य अभियंता आंशुमली श्रीवास्तव यांचा पथकात समावेश आहे.
बुधवार 17 जून सकाळी 10 वाजता महाड येथून हे पथक मंडणगडात दाखल होणार आहे. सकाळी 10.30 वाजता आंबडवे, 11 वाजता शिगवण, 11.55 वाजता केळशी, 12.30 वाजता आडे, 1 वाजता पाजपंढारीत पथकाकडून पाहणी केली जाणार आहे. दुपारी 1.50 वाजता हे दापोली येथे दाखल होईल. दुपारी 3 वाजता मुरुड, 3.35 वाजता कर्दे येथे पहाणी केली जाणार आहे. सायंकाळी 04.30 दापोली येथे आगमन व जिल्हाधिकाऱयांसोबत आढावा बैठक होईल. रात्री पथकाचा दापोलीतच मुक्काम असेल. गुरुवार 18 जून रोजी सकाळी 9 वाजता दापोलीतून रायगडमधील मांडवा जेट्टीकडे पथक प्रयाण करेल.