प्रतिनिधी / सातारा
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरुन नाभिक समाजाचा अपमान केला आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणा करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी समाजाच्यावतीने निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनात भरत लोकरे, संजय पोतदार, प्रमोद क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, केंद्रीय मंत्री दानवे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे तीव्र भावना झाल्या आहे. त्यांनी नाभिक समाजाची बदनामी केली आहे. आठ दिवसात त्यांनी जाहीर माफी मागितली नाही तर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालना येथील निवासस्थानासमोर लाखोच्या संख्येने राज्यातील नाभिक समाज मुंडन आंदोलन करतील असा इशारा दिला आहे.