महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांचे वाद आता केवळ बोलण्याच्या पातळीवर राहिले नाहीत. ते ‘ठोशाला ठोसा’च्याही पुढे जाऊन केंद्र-राज्य संबंध अधिक तिखट होण्यापर्यंत पोहोचले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्ये÷ नेते शरद पवार यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर केलेली टोकाची टीका, दोघांमध्ये नुकतीच झालेली बैठक, नारायण राणे यांनी केलेला प्रहार, नवाब मलिक यांनी एनसीबी विरोधात उघडलेली मोहीम, संजय राऊत यांनी पिंपरी-चिंचवडच्या स्मार्ट सिटी योजनेतील भाजपच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण अभ्यासण्याचे किरीट सोमय्यांना दिलेले आव्हान, त्यावर सोमय्यांचा ठाकरेंवर विश्वास नाही का? असा केलेला पलटवार, अजितदादांनी आजच पत्रकार परिषद घेऊन 65 साखर कारखान्यांच्या विक्री आणि चालवण्यास देण्यात झालेल्या तीन कोटी पासूनच्या व्यवहारांचा केलेला खुलासा, ते कोणी घेतले याची खात्री करण्याचे, कायदेशीर प्रक्रिया तपासण्याचे दिलेले आव्हान, भाजपमध्ये आलेल्या कारखानदारांना अमित शहा यांनी आयकरातून सवलत देण्याची दर्शवलेली तयारी, मंत्री वडेट्टीवार यांनी गडकरिंनी फडणवीसांची जिरवली अशा संदर्भाने केलेले वक्तव्य त्यावर गडकरिंनी ही आमची नव्हे तर काँग्रेसची संस्कृती असल्याचा केलेला खुलासा, नांदेडच्या खतगावकर यांनी भाजपला पोट निवडणुकीच्या तोंडावर केलेला रामराम, चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमय्या नांदेडमध्ये जाणार असल्याची केलेली घोषणा, राज ठाकरेंच्या अयोध्यावारीची घोषणा या गतीने झालेल्या घडामोडी राज्यात सत्तासंघर्ष तीव्र झाल्याची जाणीव करून देत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसऱयाच्या मेळाव्यात भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर जोरदार टीका केली. केंद्राच्या यंत्रणांना आपण घाबरत नाही, हिंमत असेल तर थेट समोर या असे आव्हान दिले. शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेला संघर्ष टोकाला पोचल्याचे हे लक्षण आहे. केंद्र सरकार राज्यांना नुकसान पोहोचवत असून केवळ गुजरातला महत्त्व मिळतेय, केंद्र सरकारने कितीही आव्हानं उभी केली तरी आपण झुकणार नाही, ईडी, सीबीआयला आम्ही घाबरत नाही. धमकी देऊन पोलिसांच्या मागे लपणारे आम्ही नाही, देशात हिंदुत्व धोक्मयात आहे अशी चर्चा भाजप उठवते. पण हिंदुत्वाला बाहेरच्या लोकांकडून नव्हे तर नवहिंदू आणि या विचारसरणीचा वापर करून सत्तेची शिडी चढणाऱयांकडून धोका आहे. अशी टोकाची भाषा उद्धव ठाकरे यांनी प्रथमच केली आहे.
भाजपला महाविकासआघाडी सरकार पाडून दाखवण्याचे आव्हान देतानाच रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना मात्र ठाकरे जपून बोलले. भागवत यांनी देशातील सर्वांचे पूर्वज एक होते, असं म्हटलं. ते खरं आहे असे म्हणत ठाकरे यांनी, मग विरोधी पक्षांचे पूर्वज परग्रहावरून आले होते की या आंदोलक शेतकऱयांचे-लखीमपूर खेरीतील शेतकऱयांचे पूर्वज परग्रहावरून आले होते? असा प्रश्न केला. भाजपला ना सावरकर समजले, ना गांधी समजले अशी टीकाही त्यांनी केली.
भाजपशी नजीकच्या काळात जोडून घेण्याचे सर्व दोर कापले गेले आहेत हेच त्यांनी आपल्या वक्तव्यातून स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निमित्ताने शिवसेना भाजपशी जुळवून घेईल ही शक्मयताही संपुष्टात आली असून त्यामुळे राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार पुन्हा स्थापन होईल याबाबत वेळोवेळी होणाऱया चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अर्थात याबाबतचा स्पष्ट संदेश शिवसेनेने त्या, त्या वेळी दिला तरी सुद्धा भाजपकडून प्रस्ताव असल्याच्या पुडय़ा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून वारंवार सोडल्या जात असतात. या नंतरही त्याला पूर्णविराम मिळेल ही शक्मयता नाहीच. पण मुंबई महापालिका निवडणुकीत हे पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणारच आहेत हे स्पष्ट दिसत असतानाही संभ्रमाचे वातावरण निर्माण होतच
असते.
दुसरा संभ्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत होता. राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षातील प्रमुख मंडळींच्यावर छापे, चौकशा सुरु असतानाच जीएसटी कौन्सिलच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती केल्याने राष्ट्रवादी आणि भाजपचे जुळण्याची चर्चा उठवण्यात आली होती. त्यानंतरच्या काळात शरद पवार यांनी मोदी सरकारविरोधात टोकाची टीका केली आणि त्याच वेळी अजितदादांसह त्यांच्या नातेवाइकांच्या घरावर छापे टाकण्यात आले. या सरकारी पाहुण्यांना तपासणी पूर्ण झाल्यानंतर ही आपल्या मुलींच्या घरी विनाकारण केंद्राच्या इशाऱयावरून दोन-तीन दिवस थांबवून ठेवले असा आरोप शरद पवार यांनी केला आहे. ही दडपशाही असल्याचे सांगून पवार यांनी या संदर्भाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली. या चर्चेत केंद्र सरकार विरोधात आक्रमक होतानाच केंद्रीय यंत्रणांना कोणत्या पद्धतीने अटकाव करता येईल या विषयावर दोघात चर्चा झाल्याचे समजते. यातून आता भाजप नेत्यांच्या चौकशीचा ससेमिरा राज्य सरकारकडून मागे लावला जाण्याची शक्मयता वर्तवली जात आहे.
भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी फोन टॅपिंग व गोपनीयता भंग प्रकरणात वरि÷ अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे का? असे न्यायालयाने पोलिसांना विचारल्यावरून तपास सुरू असल्याचे न्यायालयात सांगण्यात आले आहे. त्यामुळे सायबर पोलीस ठाण्यात अज्ञातावर दाखल गुन्ह्यात सरकारला देवेंद्र फडणवीस यांना गोवायचे असेल तर त्यांनी सभागृहात आरोप केले असल्याने त्यांना संरक्षण प्राप्त आहे. याचा सरकारपुढे पेच आहे. फरार परमवीरसिंग यांच्यावर दाखल खंडणीच्या गुन्ह्यात गुजरातमधून एकाला पोलिसांनी अटक करून त्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत.
सरकारविरोधातील घटकांना आता गांभीर्याने घेतले जात आहे याचेच हे लक्षण. यातून केंद्रीय मंत्रांच्या बाबतीत राज्य सरकारने काही कठोर निर्णय घेतले तर त्यातून राज्य विरुद्ध केंद्र अशी ठिणगी पडण्याचीही चिन्हे आहेत. छापे टाकून थेट पवार परिवाराला आणि राज ठाकरेंना अयोध्येला निमंत्रण देऊन उद्धव ठाकरे यांना दुखावल्या नंतर या शक्मयता अधिक गडद झाल्या आहेत. याचे पर्यवसान केंद्र-राज्य संबंध अधिक तिखट होण्यातच होऊ शकते.
शिवराज काटकर