वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना विषाणू संसर्गाचा फेलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा सोडल्यास अन्य सर्व व्यवहार ठप्प आहेत. याचा सर्वाधिक फटका देशातील गरीब जनतेला बसला असून, त्यांच्याकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष होत आहे. असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केला. गरीब जनतेचे अतोनात हाल सुरू आहेत. त्यांच्यापर्यंत अद्याप सरकारची कोणतीही मदत पोहचलेली नाही. हातावर पोट असणाऱया कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. त्यांना तत्काळ धान्य आणि पेसे देण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.