ऑनलाईन टीम / तिरूवनंतपूरम :
केरळमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि 1957 मधील तत्कालीन मुख्यमंत्री के. आर. गौरी यांचे मंगळवारी निधन झाले. वयाच्या 102 व्या वर्षी त्यांनी तिरूवनंतपूरम येथील रुग्णालयात अंतिम श्वास घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी त्यांना थंडी, ताप आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांचे आज निधन झाले आहे. त्यांचा जन्म 14 जुलै 1919 रोजी अट्टप्पुझा जिल्ह्यातील चेरथळा येथील पट्टनक्कड येथे झाला होता.
1957 मध्ये केरळमध्ये प्रथमच आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आलेल्या गौरी ई.एम.एस. नंबुद्रीपाद यांच्या मंत्रिमंडळातील पहिल्या महसूलमंत्री व महिला मंत्री बनल्या व नंबुद्रीपाद यांचे त्यावेळचे मंत्रीमंडळ-सरकार हे जगाच्या साम्यवाद आणि साम्यवाद्यांच्या इतिहासातील पहिले निर्वाचित मंत्रीमंडळ ठरले हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
गौरी अम्मा यांचे निवडणूकविषयक राजकीय वैशिष्ट्य म्हणजे 1957 पासून त्यांनी एकूण 16 सार्वजनिक निवडणुका लढविल्या असून त्यापैकी3 निवडणुका त्यांनी जिंकल्या तर केवळ 3 निवडणुकी त्या हरल्या व अशाप्रकारे त्यांनी निवडणुकीच्या संदर्भात हार-जीत या संदर्भात 3113 या आकडेवारीला एक नवा आयाम पण दिला आहे.
गौरी अम्मांनी प्रसंगी मार्क्सवादी पक्षांशी झालेले आपले मतभेद लपवून न ठेवता स्वत:च्या ‘जनतिपथ्य संरक्षण समिती’ या राजकीय संघटनपेची स्थापना केली व 2001 मध्ये काँग्रेस नियंत्रित राजकीय आघाडीच्या नव्या मंत्रिमंडळात पण त्या नव्याने सामील झाल्या होत्या. परिणामी केरळमधील कम्युनिष्टांपासून – कॉंग्रेसपर्यंतच्या सर्वच राजकीय पक्ष-आघाड्यांसह काम करणार्या गौरीअम्मांना सर्वजण केरळच्या राजकारणातील ‘पोलादी महिला’ म्हणूनच संबोधित करतात.