ऑनलाईन टीम / तिरूवनंतपूरम :
केरळमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. संसर्गाचे प्रमाण काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. या पार्श्वभूमीवर केरळ सरकारने राज्यातील लॉकडाऊन 23 मे पर्यंत वाढवण्याच्या निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शुक्रवारी दिली.
पुढे ते म्हणाले, तिरूवनंतपूरम, एर्नाकुलम, त्रिशुर आणि मलप्पुरम या ठिकाणी कठोर लॉकडाऊन लावण्यात आले आहे. पुढे ते म्हणाले, केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार, कोविशिल्डची दुसरी लस केवळ त्याच नागरिकांना दिली जाईल ज्यांना पहिल्या डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झाले आहेत. तसेच 18 ते 44 वयातील नागरिकांची नोंदणी उद्यापासून सुरु होणार आहे तर लसीकरणाची सुरुवात सोमवार पासून होणार आहे.
दरम्यान, मागील 24 तासात 34,694 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 93 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर आतापर्यंत राज्यातील 6,243 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कालच्या दिवसात 31,319 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आता पर्यंत 16 लाख 36 हजार 790 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.