बेंगळूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य सरकारने कर्नाटक-केरळ सीमा बंद केली होती. या विरोधात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने केरळ कर्नाटक सीमा बंद करणे केंद्र सरकारच्या नियमाचे उल्लंघन ठरते. अशा पद्धतीने रस्ते बंद करणे केंद्र सरकारच्या मार्गसूचीमधील नियमांविरोधात आहे. त्याऐवजी केरळमधून येणाऱयांसाठी कोविड चाचणी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी. शिवाय जनतेसाठी ये-जा करण्यास रस्ता बंद करता येत नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. केरळमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने राज्यातही रुग्ण संख्या वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे राज्य सरकारने केरळ सीमेलगत कर्नाटकातील रस्ते बंद केले आहेत. याविरोधात स्थानिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
Previous Articleवाहनधारकांना अचानक अडवून कागदपत्रे मागता येत नाही!
Next Article गुलबर्ग्यात माध्यमिक शाळेचे 15 विद्यार्थी पॉझिटिव्ह
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.