केरी, केळावडे भागातील नागरिकांत संताप : कोटय़वधी खर्चून जर्मन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उभारलेल्या प्रकल्पबाबत प्रश्नचिन्ह
प्रतिनिधी /वाळपई
कोटय़वधी रुपये खर्चून जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून केरी पंचायत क्षेत्रात कार्यान्वित करण्यात आलेल्या पाणी प्रकल्पातून गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे जर्मन टेक्नॉलॉजी ही गढूळ पाणीपुरवठा करण्यासाठी उभारण्यात आली आहे का? असा सवाल केरी पंचायतक्षेत्रातील नागरिकांनी केला आहे. गेल्या जवळपास एक महिन्यापासून पूर्णपणे गढूळ पाणी येत आहे. अशा पाणीपुरवठय़ामुळे केळावडे भागातील नागरिक संतप्त बनले असून लोकप्रतिनिधीही याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ व नागरिकांनी केला.
सत्तरी तालुक्मयातील केरी पंचायत क्षेत्रात शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने कोटय़वधी रुपये खर्च करून पूर्ण क्षमतेचा हा प्रकल्प उभारण्यात आला. या पाणी प्रकल्पावर जर्मन तंत्रज्ञानयुक्त यंत्रणा उभारली. ज्यावेळी ही यंत्रणा उभारण्यात आली त्यावेळी शुद्ध पाणी पुरवठा होणार अशी नागरिकांना आशा होती. मात्र कोटय़वधी रुपये खर्च करून जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करूनही गढूळ पाणीपुरवठा होत असल्यामुळे सध्यातरी नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.
याबाबत अनेकवेळा पाणीपुरवठा कार्यालयाच्या अधिकाऱयाकडे तक्रार देऊनही त्याचा कोणताही फायदा होत नसल्याचा नागरिकांचा आरोप नागरिक करत आहेत. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनाही याबाबत मोबाईल संदशाद्वारे कळविल्याची माहिती नागरिकांनी दिली.
साबांखा यंत्रणा निद्रिस्तावस्थेत?
केरी धरण प्रकल्पाच्या माध्यमातून उत्तर गोव्याच्या जवळपास 70 टक्के भागांना पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण होते मात्र अवघ्या काही अंतरावर असलेल्या केळावडे व इतर गावांना गढूळ पाणीपुरवठा होत असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याची यंत्रणा निद्रिस्त बनली आहे की काय? असा सवाल केरी भागातील नागरिक करत आहेत.
अन्य समस्यांचाही गर्तेत
केरी पंचायत क्षेत्रातील समस्या सोडविण्याच्या दृष्टिने पंचायत सदस्य अपयशी ठरल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. या भागात लोका बँकिंग सुविध उपलब्ध करून देणारी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा रामभरोसे असून या शाखेमधून समाधानकारक सेवा उपलब्ध होत नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात सातत्याने विजेचा लपंडाव सुरू असतो. याकडेही सरकारचे दुर्लक्षच आहे. सातत्याने वाहतुकीची कोंडी अशा अनेक समस्या असताना याकडे रितसर लक्ष देण्यात येत नाही हे खरोखरच दुर्दैवी असल्याच्या प्रतिक्रिया केरी पंचायत क्षेत्रातील नागरिकांतून व्यक्त होत आहेत.