वार्ताहर /केरी
सत्तरी तालुक्मयातील केरी पंचायत क्षेत्रातील केळावडे भागांत जाणाऱया रस्त्यावर असलेल्या पुलाचा कठडा असल्यामुळे या पुलावरून वाहतूक करणे धोक्मयाचे बनले आहे .यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या यंत्रणेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या खचलेल्या पुलाची ताबडतोब दुरुस्ती करावी अशा प्रकारची मागणी नागरिकांनी केली आहे.
याबाबतची माहिती अशी की केरी गावातून केळावडे गावात जाण्यासाठी साटये या नदीवर छोटासा पूल बांधण्यात आलेला आहे. काही दिवसापूर्वी या नदीला प्रचंड प्रमाणात पाणी आल्यामुळे पुलाचा एका बाजूचा कठडा खचलेला आहे. यामुळे सदर पुलावरून वाहतूक करणे आता धोक्मयाचे बनलेले आहे. सदर पूल कोसळल्यास केरी भागातून केळावडे भागाचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. सदर पुलाची उंची कमी आहे. यामुळे दरवषी पावसाळी मोसमामध्ये पुलावरून पाणी जात असते .याची गंभीर दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याने या पुलाच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर हाती घ्यावे .त्याचप्रमाणे पावसाळय़ानंतर या ठिकाणी नवीन पूल बांधण्याचे प्रयोजन करावे अशा प्रकारची मागणी नागरिकांनी केलेली आहे.
याबाबत ग्रामस्था?नी दिलेल्या अधिक माहितीनुसार दरवषी पावसाळय़ात अनेकवेळा पुलावरून पाणी जात असल्यामुळे केळावडे व इतर गावात जाणाऱया नागरिकांना धोका निर्माण होत असतो .अनेकवेळा वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडत असतात. यामुळे याठिकाणी नवीन पूल उभारल्यास ही समस्या कायमची निकालात येणार असल्याचे ग्रामस्था?चे म्हणणे आहे.
दरम्यान या संदर्भात वाळपई सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंता देवेंद्र वेलिंगकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत आपण गांभीर्याने लक्ष देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. सदर ठिकाणी नवीन पूल उभारण्याचा संदर्भाचा प्रस्ताव लवकरच तयार करण्यात येणार असून तो मंजुरीसाठी खात्याच्या वरि÷ अधिकाऱयांना पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले.