मान्सूनपूर्व दमदार पावसाने झोडपले – सर्वत्र पाणीच पाणी
प्रतिनिधी/ बेळगाव
मान्सूनपूर्व पावसाने शहरासह उपनगरे आणि ग्रामीण भागालाही दुपारीच झोडपले. या पावसामुळे अक्षरशः सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. जोरदार पाऊस झाल्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले तर अनेक रस्ते जलमय झाले होते. गटारी भरून पाणी रस्त्यांवरून वाहत होते. यामुळे ये-जा करणाऱयांची चांगलीच तारांबळ उडाली. केवळ अर्ध्या तासातच या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले. त्यामुळे साऱयांचीच धांदल उडाली. शहरातील भांदुर गल्ली, तानाजी गल्ली, कपिलेश्वर रोड परिसरात पाणीच पाणी झाले होते.
सकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि उष्म्यामध्ये वाढ झाली होती. दुपारी 2 च्या सुमारास दमदार पावसाचे आगमन झाले. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. जोरदार पाऊस पडेल अशी शक्मयता नव्हती. मात्र, अचानकपणे हा जोरदार पाऊस कोसळला आणि सर्वत्र पाणीच पाणी झाले. सध्या लॉकडाऊनमुळे शहरात शुकशुकाट पसरला होता. तरी कामानिमित्त आलेल्या अनेकांना या पावसाचा फटका बसला आहे.
या दमदार पावसामुळे सदाशिवनगर, गांधीनगर परिसरात पाणी साचून होते. अनेकांच्या घरामध्येदेखील पाणी शिरले. मान्सूनपूर्व दमदार पावसामुळे अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेकांची धांदल उडाली. मान्सूनपूर्व पाऊस दमदार कोसळल्यामुळे आता पावसाळय़ात मोठय़ा समस्येला तोंड द्यावे लागणार, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. पावसाला इतका जोर होता की बघता बघता गटारी भरून पाणी रस्त्यांवरून वाहत होते.
शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचून होते. उपनगरांतही या पावसामुळे गुडघाभर पाणी साचून होते. स्मार्ट सिटीच्या कामानिमित्त काढण्यात आलेल्या गटारी तुडूंब भरून पाणी रस्त्यांवरून वाहत होते. पाण्याचा निचरा योग्य होत नसल्याने स्मार्ट सिटीच्या कामाचा दर्जा पहिल्याच पावसात उघडा पडला आहे. गोवावेस येथील गटारींमधून पाणी पुढे जात नव्हते. केवळ वरवरचे काम करून स्मार्ट सिटी केल्याचा भंपकपणा उघडा पडताना दिसत होता. यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या स्मार्ट सिटीची अनेक कामे अर्धवट आहेत. त्यामुळे या पावसामुळे अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले होते. वास्तविक स्मार्ट सिटीचे कोणतेच काम नियोजनबद्ध होताना दिसत नाही. आता ते जोरदार पावसामुळे सर्वांच्याच नजरेला येताना दिसत आहे. सदाशिवनगर परिसरात अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. याचबरोबर वडगाव, शहापूर, केशवनगर, आनंदनगर परिसरातही गटारी तुडुंब भरून वाहताना दिसत होत्या.
दुपारीच पाऊस झाला. त्यानंतर मात्र पावसाने बऱयापैकी उघडीप दिल्याने तुंबलेले पाणी निचरा होताना दिसत होते. पावसाला जोर असल्यामुळे छत्रीचा उपयोगदेखील झाला नाही. छत्री असूनही अनेकांना भिजतच घर गाठावे लागले तर अनेकांना आडोसा शोधावा लागला.
भात पेरणी केलेल्या शेतकऱयांना दिलासा
बेळगाव तालुक्मयातील अनेक गावांमध्ये शेतकऱयांनी धूळवाफ पेरणी केली होती. त्या शेतकऱयांना पावसाची नितांत गरज होती. हा दमदार पाऊस झाल्यामुळे भात उगवणीला हा पाऊस पोषक ठरला असून शेतकऱयांना दिलासा दिला आहे. मात्र, मशागतीचे काम तसेच पेरणीचे काम या पावसामुळे खोळंबल्याचे शेतकऱयांनी सांगितले.