प्रतिनिधी / मिरज
तुमच्या बँक खात्याची केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे असे सांगून शेतकऱ्याच्या बँक खात्याची माहिती घेऊन ७४ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत राजेंद्र दत्तात्रय पोतदार (वय ५९, रा. मालगाव) यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे.
राजेंद्र पोतदार यांच्या मोबाईलवर एका अनोळखी इसमाचा फोन आला. त्याने आपण कस्टमर केअर मधून बोलत असून तुमच्या बँक खात्याची केवायसी अपूर्ण आहे, ती पूर्ण करण्यासाठी बँक खात्याची माहिती द्या असे सांगून माहिती घेतली. त्यानंतर पोतदार यांच्या आयसीआयसीआय बँक खात्यातून ७४ हजार रुपये काढून घेतले.