प्रतिनिधी/ सातारा
गतवर्षी मार्चमध्ये झालेल्या कोरोनाच्या शिरकावानंतर बाधितांच्या संख्येबरोबरच मृत्यूचेही आकडे झपाटय़ाने वाढत आहेत. या काळात आजपर्यंत 2917 कोरोना बाधितांचा बळी जिल्हय़ात गेला आहे. परंतु तब्बल 2 हजार 201 बाधित बळींवर संगममाहुली येथील कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अग्निकुंड कमी पडत असली तरी योग्य नियोजनामुळे मृतदेहावर कोरोनाच्या निकषानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.
झालेल्या अंत्यसंस्कारापैकी 80 टक्के अंत्यसंस्कार हे सातारा शहर व तालुक्यातील 12 गावे वगळता आहेत. गेल्या दहा दिवसात 322 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. कैलास स्मशानभूमीत बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट आणि सातारा पालिकेच्यावतीने परफेक्ट नियोजन केले जात आहे.
कोरोनाचा विस्तार झपाटय़ाने होत असून अनेकांचा त्यामध्ये मृत्यू होत आहे. गतवर्षीपासून कोरोना बाधितांचे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. हे मृत्यू होण्याचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठे आहे. दोन वर्षात कैलास स्मशानभूमीत 4089 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापैकी 2 हजार 201 जण हे कोरोनाने मृत्यू आलेले होते. तर दोन वर्षात 1804 जण हे सर्वसामान्य मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. गतवर्षीही ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मृत्यचे प्रमाण वाढले होते. यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात मृत्यूचे प्रमाण वाढले गेले आहे. त्यामुळे कैलास स्मशानभूमीवर ताण असून कैलास स्मशानभूमीत झालेल्या अंत्यसंस्कारापैकी 80 टक्के अंत्यसंस्कार हे सातारा शहर व शहरालगतच्या 12 गावातील नाहीत. जिह्यातील व जिह्याबाहेरील कोरोना बाधितांचा समावेश आहे.