प्रतिनिधी / सातारा :
झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिऐ… अशी म्हण आहे. त्या म्हणीचा प्रत्यय सध्या सगळीकडेच येवू लागला आहे. जरी सगळेच शिकलेले असले तरीही शिकलेले तर लगेच फसतात. तसा काहीसा प्रकार सातारा जिल्ह्यात घडला आहे. सगळय़ांकडे सध्या स्मार्ट फोन आहेत. त्या स्मार्ट फोनवर स्मार्ट व्यवहारही सगळे करतात. परंतु याचाच फायदा घेवुन काही मंडळी गंडा घालण्यात एक्सपर्ट आहेत. काही महिन्यापूर्वी अग्री डेव्हलपमेंट नावाचे ॲप आले. अन् त्या ॲपच्या मायाजालात अनेकजण सातारा जिल्ह्यातील गुरफुटले गेले. गेल्या आठ दिवसांपासून हेॲप बंद असल्याने सोन्याची अंडी देणारी कोंबडी पैसे घेवून पळाली. त्यामुळे तक्रार कोणाकडे करायची? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तामिळी द रिटर्न अभिमन्यू नावाचा सिनेमा आहे. त्यामध्ये ऑनलाईन बँक खात्यातील कशी फसवणूक केली जाते, यावर दृष्टीक्षेप टाकण्यात आलेला आहे. पोलीस दल सातत्याने ऑनलाईन फसवणूक होवू शकते. स्मार्ट फोन वापरताना काळजी घ्या, असे आवाहन करत असते. परंतु माणसाला पैशाचा मोह कधी थांबला आहे का?, कमी श्रमात जास्त पैसा मिळवण्याच्या मागे प्रत्येकजण लागेला असतो अन् त्यातच जे जवळचे असते तेही गमवून बसतो. मग डोक्याला हात लावून पश्चाताप करत बसतो. सातारा जिल्ह्यातील जनतेला यापूर्वी पर्ल्स, ट्विंकल यासाख्या अनेक कंपन्यांनी चैन सिस्टिमच्या नावाखाली दहा ते पंधरा वर्षापुर्वी पैसे गोळा करुन पोबारा केला. अद्यापही पेसे मिळाले नाहीत. असे प्रकार घडत असतानाही जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापूर्वी ऍग्री डेव्हलपमेंट ॲप नावाचा प्रकार आला होता. त्याचा प्रचार माऊथ टु माऊथ असा झाला अन् बघता बघता अनेकांनी ते ॲप आपल्या मोबाईलवर इन्स्टॉल केले गेले अन् त्या ऍपचे सभासद झाले.
कोणी पाचशे रुपयाची कोंबडी घेत तर कोणी हजार रुपयांचा शहामृग घेत तर कोणी दोन हजार रुपयांचे बकरी घेत. जशी गुंतवणूक करत तसे त्यांना रिवॉर्ड मिळत असे असे फसवणूक झालेले सांगतात. परंतु गेल्या आठवडय़ापासून हे ॲपच बंद झाले त्यामुळे कोणी पाचशे, कोणी हजार रुपये गुंतवले त्यांना आपले पैसे मिळतील कसे याची चिंता लागून राहिले आहे. हे अडकलेले पैसे मागायचे कोणाकडे यांचे कोठे कार्यालयाही नाही. ना कॉन्टॅक्ट नंबर नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांना कोडे पडले आहे. त्यामुळे स्मार्ट फोनच्या जमान्यात सातारा जिह्यातील अनेकांना स्मार्ट असा चुना लागलेला असून कोणी फसवणूक झालेला पोलिसांपर्यंत जायलाही त्यांच्याकडे पैसे गुतंवणूक केल्याचा कसलाही पुरावा नाही. परंतु त्या ॲपचा सभासद होताना त्यांच्याकडे बँकेचे डिटेल्स देवून बसले असल्याने आहे हेही खाते रिकामे होण्याची भिती व्यक्त होत आहे.
कृषी विभागाचा काही संबंध नाही
शासनाचा कृषी विभाग लोकांना पैसे भरा म्हणून कधीही सांगत नाही वा तसले फसवे ॲप शासनाकडून काढले जात नाही. त्या ॲपशी कृषी विभागाचा काहीही संबंध नाही. ज्यांची फसवणूक झाली त्यांनी सायबर क्राईमशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक गुरुदत्त काळे यांनी केलेले आहे.