मालवण /प्रतिनिधी-
कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळांची वाढती संख्या, अतीवृष्टी आणि महापूरांसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर कोकणातील आपत्ती व्यवस्थापनासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात ३२०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी यासंबंधीची घोषणा शुक्रवारी विधीमंडळात केली.