आमदार योगेश कदम यांचा पुढाकार, थेट शेतकऱयाच्या बांधावरून होणार खरेदी
राजू चव्हाण/ खेड
कोकणातील बेरोजगारी संपुष्टात आणून शेतकऱयांमध्ये आर्थिक सुबत्ता निर्माण करण्यासाठी शिवतेज आरोग्य सेवा संस्था व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्या माध्यमातून कोकणातील पहिला भाजीपाला कोल्ड स्टोअरेज प्रकल्प जामगे येथे साकारत आहे. या प्रकल्पाव्दारे थेट शेतकऱयांच्या बांधावरूनच भाजीपाल्याची खरेदी होणार आहे. त्यामुळे शेतकऱयांच्या मालाला योग्य भाव मिळण्यास मदत होणार आहे.
आमदार योगेश कदम यांच्या संकल्पनेतून साकारणाऱया प्रकल्पासाठी शिवतेज आरोग्य सेवा संस्थेने साडेचार एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. या प्रकल्पाच्या माध्यामातून थेट शेतकऱयांच्या बांधावरूनच भाजीपाल्याची खरेदी करण्यात येणार असून शेतकऱयांच्या मालाला योग्य भाव मिळणार आहे. त्यामुळे खऱया अर्थाने आर्थिक उत्कर्ष होणार आहे. यामुळे हा प्रकल्प बेरोजगारांसह शेतकऱयांसाठी वरदान ठरणार आहे.
आमदार कदम यांनी आमदार होण्यापूर्वीच कोकणातील बेरोजगार तरूणांच्या हाताला काम देण्यासाठी उद्योगांचे जाळे विणण्याची घोषणा केली होती. या घोषणेची प्रत्यक्षात पूर्तता या प्रकल्पाद्वारे होणार आहे. या प्रकल्पात आंब्याचे रॅपनिंग चेंबरही असून यापुढे कोकणातील आंबा कोकणाबाहेर पाठवण्याची गरज भासणार नाही. माजी पर्यावरणमंत्री व शिवसेना नेते रामदास कदम यांच्या माध्यमातून प्रकल्पासाठी 8 कोटी 50 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. गेल्या 3 वर्षापासून प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर तालुक्यातील शेतकऱयांचा भाजीपाला खरेदी करून त्यांच्या मालाला योग्य हमीभाव दिला जाणार आहे.
300 हून अधिक बेरोजगारांच्या हाताला मिळणार काम
या प्रकल्पांतर्गत 300हून अधिक बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे. शेतकऱयांकडील उत्पादित फळे व भाजीपाला पॅकिंग करून त्यावर तीन टप्प्यात प्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी या प्रकल्पात अद्ययावत यंत्र सामुग्री उभारण्यात येणार आहे. भविष्यात शेतकऱयांकडून खरेदी केलेल्या फळे, भाजीपाल्यातून मिळणाऱया उत्पन्नातून शेतकऱयांसाठी मोफत प्रशिक्षण, खते व औषध फवारणी, पंप वाटप करण्यात येणार आहे.
प्रकल्प बेरोजगारांसाठी माईलस्टोन ठरेल!
बेरोजगार तरूणांना सद्मार्गावर आणून त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी साकारण्यात येत असलेला हा प्रकल्प बेरोजगार तरूणांसह शेतकऱयांसाठी माईलस्टोन ठरेल, असा विश्वास आमदार योगेश कदम यांनी व्यक्त केला. या प्रकल्पांतर्गत शेतकरी, निर्यातदार व संस्था सामुदायिकरित्या काम करणार असल्याने याचा फायदा शेतकऱयांच्या आर्थिक सुबत्तेसाठी नक्कीच होईल, असा आत्मविश्वासही व्यक्त केला.