गावपातळीपासून केंद्रीय पातळीपर्यंत सारेच लोक कोकणातील बाधित दराविषयी सचिंत आहेत़ यातून मार्ग काय काढावा असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आह़े
कोरोना या साथ रोगाचा प्रसार मोठय़ा प्रमाणात होत असल्याने आरोग्य व सामाजिक क्षेत्राचे नेतृत्व करणाऱया सर्वांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत़ कोरोना वाढीचा दर महाराष्ट्रातील आठ जिह्यांमध्ये चिंताजनक असल्याने केंद्र सरकारने एक आरोग्य पथक राज्यात पाठवले आह़े राज्यातील कोरोना नियंत्रण वाटचालीबाबत आढावा घेऊन मार्गदर्शन करण्याची जबाबदारी या पथकावर सोपवण्यात आली आह़े राज्याच्या चिंतेचे कारण अन्य जिह्यांबरोबरच रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील आकडेवारी आह़े
सध्या सिंधुदुर्ग जिह्यात एकूण बाधित संख्येने 45 हजारचा आकडा ओलांडला आह़े आतापर्यंत तेथे 1,132 एवढे मृत्यू झाले आहेत़ 39,745 लोक बरे होउढन घरी परतले आहेत़ सध्या सिंधुदुर्गात 4,250 सक्रीय रुग्ण आहेत़ त्यापैकी 230 लोकांची प्रकृती चिंताजनक आह़े यातील 185 लोकांना प्राणवायूवर ठेवण्यात आले आह़े तर 45 लोक व्हेंटीलेटरवर आहेत़
रत्नागिरी जिह्यात कोरोना रुग्णसंख्येने 67 हजारचा आकडा पार केला आह़े एकूण मृत्यूंची संख्या 1,900 हून जास्त झाली आह़े रत्नागिरी जिह्याचा मृत्यूदर 2.85… इतका आह़े आरटीपीसीआर चाचण्यांचा बाधित दर 11.55 एवढा आह़े बरे झालेल्या रुग्णांची संख्या 61 हजार आह़े सध्या 3,660 रुग्ण उपचार घेत आहेत़ ही संख्या सिंधुदुर्ग जिह्यापेक्षा कमी आह़े
कोरोनामुळे आरोग्य यंत्रणाच नव्हे तर समाजातील प्रत्येक क्षेत्र बाधित झाले आह़े जोवर साथरोगाला पायबंद घालण्यासाठी ठोस उपाय पुढे येत नाहीत तोवर सामान्यांना दिलासा मिळणे ही कठीण बाब होऊन बसली आह़े गावपातळीपासून जिल्हापातळीपर्यंत एवढेच काय तर राज्य व केंद्रीय पातळीपर्यंत सारेच लोक कोकणातील बाधित दराविषयी सचिंत आहेत़ यातून मार्ग काय काढावा असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आह़े
राज्य सरकारने गृह विलगीकरण कमी करावे शक्यतो बंदच करावे, अशा सूचना केल्या होत्य़ा तथापि आरोग्य यंत्रणेकडे उपलब्ध असलेली व्यवस्था पाहता ज्या रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत त्यांना घरीच विलगीकरणात उपचार घेण्याचे धोरण ठेवावे लागले आहे. रत्नागिरी जिह्यात सध्या 42… रुग्ण घरी उपचार घेत आहेत़ लोकांनी घरी उपचार घेताना अनेक पथ्ये पाळावीत म्हणून सूचना देण्यात आल्या आहेत़ या सूचनांची माहिती आरोग्य कर्मचारी गृह विलगीकरणातील प्रत्येकाला देत असतात़ तथापि अनेक लोकांकडून त्याचे पालन होत नाही, असा आक्षेप आह़े
कोणतीच लक्षणे नाहीत परंतु चाचणीमध्ये व्यक्ती बाधित झाली आहे, असे आढळल्यास त्या व्यक्तीला कोणाच्याही संपर्कात न येता घरी थांबावे असे सुचवले जात़े प्रत्यक्षात कुटुंबातील सर्वजण दैनंदिन व्यवहार एकत्र करत असतात़ कुटुंबीय मंडळींपासून रुग्ण कोणत्याही अर्थाने विलग नसत़ो सातत्याने रुग्णाच्या संपर्कात असलेले हे कुटुंब त्यांच्या दैनंदिन कामासाठी घराबाहेर पडतात़ सध्या शेतीची कामे जोरावर आहेत़ शेतीत गेल्यानंतर आजुबाजूचे अनेक लोक मदतीला येतात किंवा संपर्कातही येतात़ त्यातून रोगाचा प्रसार मोठय़ा प्रमाणात होत असल्याची चिंता जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागाला लागली आह़े
या कुटुंबात रुग्ण अलगीकरणात आहे तेथे कुटुंबीय मंडळी वेगवेगळ्या कामांसाठी घराबाहेर पडतात़ कोणी बाजारहाटला जातो तर कोणी अन्य ठिकाणी नोकरीला जात़ो हे लोक ज्या ज्या ठिकाणी जातात तेथे लागण होत असते. काही वेळा या कुटुंबीयांना कोणतीही लक्षणे नसतात. तथापि, ते साथ रोगाचे वाहक ठरतात़ यापूर्वी केवळ शहरात लागण जर जास्त असल्याचे दिसून येत होत़े आता ग्रामीण भागात कोरोना आटोक्यात येता येईना, अशी परिस्थिती झाली आह़े
रुग्णालयातील अथवा दूरवरच्या क्षेत्रात काम करणाऱया आरोग्य कर्मचाऱयांना सध्याच्या साथ रोगांनी खूपच थकवून टाकले आह़े साप्ता†िहक सुट्टी सोडा परंतु कोणतीही बाबतीत उसंत घेण्यास संधी मिळत नाह़ी या सर्वाचा परिणाम आरोग्य यंत्रणेच्या मनोबलावर झाला असून यापुढे रोग नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा पहिल्या उमेदीने उभी राहणे अवघड दिसत आह़े
कोरोना उपचार केंद्रात अथवा कोरोना काळजी केंद्राची उभारणी ग्रा.पं. स्तरावर मोठय़ा प्रमाणात झाली आह़े तेथे असलेल्या रुग्णांना भेटायला गावकरी येत आहेत़ नाश्ता, जेवण दिले जात आह़े डब्यांची देवाण-घेवाण होत आह़े असे असताना पुरेशी काळजी घेतली जात नाह़ी ग्रा.पं. स्तरावरील केंद्रामधील नियमनांची योग्य व्यवस्था नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नियंत्रण कसे राहणार असा प्रश्न आरोग्य यंत्रणेसमोर आह़े कोविड सेंटरमध्ये रहिवास करणाऱया रुग्णांपासून गावातल्या अन्य लोकांना बाधा होऊ शकते, याची जाणीव देणारी व्यवस्था कशा स्वरूपात उभी करता येईल, असे आरोग्य यंत्रणेला वाटत आह़े
एवढय़ातच कोकण रेल्वे आणि भारतीय रेल्वेने गणेशोत्सवासाठी मुंबई-गोवा महामार्गावर खास गाडय़ा सोडण्याचे ठरवले आह़े 72 हून अधिक विशेष फेऱयांचे नियोजन करण्यात आले आह़े याशिवाय राज्य परिवहन महामंडळाने जादा गाडय़ा गणेशोत्सवासाठी सोडण्याचा विचार केला आह़े यामुळे मुंबई तसेच अन्य भागातील चाकरमानी कोकणातील घरी गणेशोत्सवाला येण्याच्या निश्चित होत आह़े एका बाजूला लोकांच्या प्रवासाची सुविधा निश्चित होत असताना दुसऱया बाजूला यातून पुन्हा एकदा कोरोना रुग्णवाढ होणार नाही ना अशी चिंता निर्माण झाली आह़े रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी याविषयी आढावा घेण्यात येईल आणि योग्य ते निर्देश जारी करण्यात येतील, असे म्हटले आह़े चाकरमान्यांपासून कोरोना प्रसार होऊ नये याकरिता शासकीय बंधने घातली जाण्याची शक्यता यातून तयार झाली आह़े
सुकांत चक्रदेव