प्रतिनिधी/बांदा
गणेशोत्सव कालावधीत कोकणात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी येतात. रेल्वे मार्गावर दरड कोसळली असल्याने या मार्गे वाहतूक बंद होती. मात्र रेल्वे कडून कोकण रेल्वेच्या मार्गावर गणेशोत्सवासाठी स्पेशल गाड्यांची घोषणा रेल्वे कडून करण्यात आली आहे.14 ऑगस्ट ला पहिली गाडी सुटणार आहे.14 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर पर्यंत सुटणाऱ्या 162 गाड्यांची घोषणा केली आहे. 81 अप तर 81 डाऊन गाड्यांची घोषणाकेली. याबाबतचे वेळापत्रक लवकर जाहीर होईल अशी माहिती रेल्वे कडून देण्यात आली. यामुळे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.