रत्नागिरीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पत्रकार परिषदेत प्रतिपादन
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोकणासारख्या जागी रिफायनरीसारखे प्रकल्प येवू नयेत, या मतावर आजही आपण ठाम आह़े मात्र गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत़ आता आणखी प्रकल्प राज्याबाहेर जाणे आपल्याला परवडणारे नाह़ी त्यामुळे रिफायनरी प्रकल्प ही आता मजबुरी झाली आहे, असे प्रतिपादन करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी रिफायनरी प्रकल्पाला एकप्रकारे समर्थन दर्शवल़े
रत्नागिरी दौऱयावर आलेले मनसे प्रमुख राज ठाकरे हे शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत बोलत होत़े यावेळी राज ठाकरे यांनी सांगितले की, रिफायनरी प्रकल्पाबाबत कोकणाने राग व्यक्त करायला पाहिजे, तसा होताना दिसून येत नाह़ी काही केले तरी लोक आपल्याला मतदान करतात, हे लोकप्रतिनिधींच्या पथ्यावर पडत आह़े मुंबई-गोवा महामार्गा अनेक वर्षापासून रखडलेल्या अवस्थेत आह़े याबद्दल कुणी काही बोलत नाह़ी सध्या कोणता आमदार कुठे गेला, हेच समजून येत नाह़ी लोकं हे सगळं खपवून घेतात. त्यामुळेच असे प्रकार होत आहेत़
कोकणातील लोकांनी जमिनी विकताना सतर्क रहावे
बाहेरची माणसे कोकणात येवून मोठय़ा प्रमाणावर जमिनी विकत घेत आहेत़ कवडीमोलाने जमिनी विकल्या गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रकल्प येणार असल्याची घोषणा राज्य शासनाच्यावतीने करण्यात येत़े यामुळे जमीन मालकांचे मोठे नुकसान होत असल्याचे दिसत आह़े त्यामुळे जमिनींची विक्री होत असताना कोकणातील लोकांनी अधिक सतर्कता बाळगणे आवश्यक आहे, असे ठाकरे म्हणाले.
पक्षाच्या कामकाजात जमीन आसमानाचा बदल दिसेल
सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर मनसे कार्यकर्ते कुठेही दिसून येत नसल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे यांनी सांगितले की, पक्षाच्या कामकाजात लवकरच बदल करण्यात येणार आह़े जनतेला नवीन पर्याय देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत़ पक्षाच्या कामकाजात आता जमीन आसमानएवढा फरक, बदल आपल्याला दिसून येईल, असे ठाकरे यांनी सांगितल़े
मुळ विषयांपासून लक्ष हटवण्यासाठी वादग्रस्त वक्तव्य
सीमा विवादाबाबत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेले वक्तव्य पटकथेचा भाग असल्यासारखे वाटत आह़े जाणूनबुजून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आह़े सर्वसामान्य जनतेचे मुळ विषयापासून लक्ष हटविण्यासाठी वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत आहेत़ त्यांना काय करायचे ते करू द्यावे. आपण नवीन पर्याय जनतेसमोर देणार आहोत, असेही राज ठाकरे म्हणाले.
तज्ञ लोकांनाच इतिहासावर बोलण्याचा अधिकार
आजकाल कोणीही उठून इतिहासावर बोलत आह़े हर हर महादेव हा चित्रपट बनवणाऱया लोकांशी विरोध करणाऱयांनी संवाद करायला हव़ा माहिती व संदर्भ कोठून घेतली, याविषयी चर्चा केली पाहिज़े इतिहासाला धक्का न लावता एखादी गोष्ट सिनेमात मांडली तर त्यात गैर असे काही नाह़ी मात्र इतिहासावर बोलण्याचा अधिकार हा इतिहास तज्ञांनाच आहे, असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितल़े