प्रशासनचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
प्रतिनिधी/ रत्नागिरी
राज्याच्या किनारपट्टी भागात चक्रीवादळाचं संकट घोंघावत असून येत्या 48 तासा कोकण किनाऱयावर हे वादळ धडकण्याची भीती आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण किनारपट्टीभागातही चक्रीवादळाचे संकेत आहेत. त्यामुळे हवामान खात्याकडून रत्नागिरी जिल्ह्य़ातील नागरिकांना सावधानतेचा व सुरक्षिततेचा इशारा देण्यात आला आहे.
पश्चिम किनारपट्टीला वादळाचा धोका असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या वादळाचा परिणाम म्हणून 2 व 3 जूनला कोकणात विजांचा कडकडाट, जोरदार वारा व मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याची चिन्हे दोन दिवसांपासून दिसू लागली आहेत. अनेक भागात ढगाळ वातावरण होऊन किरकोळ पाऊस पडत आहे. रत्नागिरी जिह्यात रविवारी पावसाने हजेरी लावली होती. सोमावारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते.
पुढील 24 तासात अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दोन्ही किनारपट्टीतील राज्यांना 3 जूनपर्यंत वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. कोणीही समुद्रात जाऊ नये, सावधानता व सुरक्षितता बाळगावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नुकतेच अम्फान चक्रीवादळ ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये धडकले होते. त्यानंतर 10 दिवसानंतर महाराष्ट्र आणि गुजरातसाठी हवामान खात्यानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दोन्ही किनारपट्टीतील राज्यांना 3 जूनपर्यंत वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.
या वादळाची पुढील 24 तासांत तीव्रता वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. वायव्य दिशेकडे वाटचाल करीत हे वादळ गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आदळेल. विशेष म्हणजे, 10 दिवसांपूर्वी, बंगालच्या उपसागरातून आलेल्या वादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये मोठी हानी झाली. त्या आपत्तीत 86 लोक दगावले तर अनेक बेघर झाले. त्यामुळे आताच्या चक्रीवादळाचा धोका बसू नये यासाठी राज्यांना ततर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 4 जूनसाठी किनारपट्टीवरील महाराष्ट्र, गोवा आणि संपूर्ण गुजरातसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. चक्रीवादळाच्या वादळामुळे या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनस्तरावरून नागरिकांना देण्यात आले आहे.