ऑनलाईन टीम / मुंबई :
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे येत्या 48 तासात मुंबई, रायगड, पालघर आणि कोकण किनारपट्टीवरसह मध्य महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गुरुवारी रात्रीपासून मुंबईत पावसाची संततधार कायम आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत पावसाचा जोर वाढला असून, पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई समुद्र किनाऱ्यावरील मच्छिमारांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.