प्रतिनिधी/ लांजा
कोकण रेल्वे आणि नर्मदा बायोकेम लि. व जिंदल जयगड पोर्टच्या माध्यमातून रत्नागिरी रेल्वेस्थानकावरून आर्थिक वर्षात 87 रेकमधून 2 लाख 50 हजार मेट्रिक टन युरिया खत महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या राज्यात शेतकऱयांना उपलब्ध झाले आहे. त्यामुळे परदेशातून आलेले खत शेतकऱयांना दिलासादायक ठरले आहे. लॉकडाऊन काळाबरोबरच कोकण रेल्वेने खरिप हंगामात आतापर्यंत 12 रेकमधून 31 हजार टन राज्यातील शेतकऱयांना युरिया खताचा पुरवठा केला आहे.
यावर्षीही नर्मदा बायोटेक ही खत कंपनी 3 लाख 50 हजार मेट्रिक टन परदेशातून आयात करणार आहे. नर्मदा बायोकेम लि. आणि कोकण रेल्वेमुळे शेकडो कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. नर्मदा बायोकेमचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश पटेल आणि कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक गुप्ता आणि जिंदल जयगड पोर्टचे संचालक यांनी ही राज्यातील शेतकऱयांना लाभदायक संधी उपलब्ध करून दिली आहे. केंद्र सरकारच्यावतीने नर्मदा बायो युरिया खताने शेतकऱयांना दिलासा मिळाला आहे. परदेशातून युक्रेन, गल्फ देशातून युरिया खत नर्मदा बायो केम कंपनीमार्फत आयात होत असल्याचे नर्मदाचे रत्नागिरी जिल्हा व्यवस्थापक अमित दीक्षित यानी सांगितले.
2020 ते 2021 या आर्थिक वर्षात 3 लाखाहून अधिक युरिया खत कोकण रेल्वेमधून विविध राज्यात उपलब्ध होणार आहे. जयगड पोर्टवरून रत्नागिरी रेल्वेस्थानक येथे मालगाडीतून खत वितरित होत आहे. लॉकडाऊनमध्ये कोकण रेल्वे आणि नर्मदाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.