प्रतिनिधी/ रत्नािगरी
चिपळूण तालुक्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कामथे आणि सावर्डा दरम्यान रुळांवर पाणी आले सोमवारी जनशताब्दी एक्सप्रेस रखडली होती. गाडय़ांचा वेग कमी करण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला.
सोमवारी संध्याकाळी राजापूर आणि खारेपाटण दरम्यान दरड कोसळली आहे. माती दूर करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे, असे रेल्वे अधिकारी यांनी सांगितले. दरडीमुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली.