पोलीस वनविभागाची कारवाई, आजरा तालुक्मयातील दोघा जणांना अटक
प्रतिनिधी/ बेळगाव
कोगनोळी जवळ चार हरणांची शिंगे जप्त करण्यात आली आहेत. शुक्रवारी बेळगाव येथील पोलीस वनविभागाच्या पथकाने ही कारवाई केली असून या प्रकरणी आजरा तालुक्मयातील दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. या पथकाने वन्य प्राणी, कातडी, शिंगे, हस्तीदंत आदींची तस्करी करणाऱया गुन्हेगारांविरूध्द मोहीम तीव्र केली आहे.
तेजस तानाजी पाटील (वय 24) त्याचा भाऊ तुषार तानाजी पाटील (वय 29, दोघेही रा. कोरीवडे, ता. आजरा, जि. कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. पोलीस उपनिरीक्षक रोहिणी पाटील, हवालदार आर. बी. यरनाळ, एस. आर. अरीबेंची, के. डी. हिरेमठ, जीप चालक बी. बी. इंगळगी आदींनी ही कारवाई केली आहे.
डोक्मयाच्या हाडासमवेत हरणाची शिंगे जप्त करण्यात आली असून पंचासमक्ष पोलीस वनविभागाच्या अधिकाऱयांनी ती ताब्यात घेतली आहेत. अटक करण्यात आलेल्या दोघा जणांवर वन्यजीवी संरक्षण कायदा 1972 कलम 9, 39, 51 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आले असून त्यांना निपाणी न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.
हे प्रकरण पुढील तपासासाठी रायबाग येथील वनविभागाच्या अधिकाऱयांकडे सोपविण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक रोहिणी पाटील यांच्या नेतृत्वाखाली तस्करांविरुध्द मोहीम उघडण्यात आली आहे. दुतोंडी साप, घुबड, माकड आदी वन्य जीवींबरोबरच हस्तीदंत, कातडी, शिंगांची तस्करी करणाऱया अनेकांना अटक करण्यात आली आहे.