प्रवाशांना आरटीपीसीआर बंधनकारक : फौजदार अनिल कुंभार यांची माहिती
वार्ताहर /कोगनोळी
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील कोगनोळी येथील दूधगंगा पुलावरील सीमा तपासणी नाक्मयावरून आरटीपीसीआर अहवाल नसल्यामुळे 13 बसेस रविवारी रात्री महाराष्ट्रात परत पाठविण्यात आल्या. महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सीमा तपासणी नाक्मयावर बंदोबस्त वाढविण्यात आला आहे, अशी माहिती निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे फौजदार अनिल कुंभार यांनी दिली.
मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथून कर्नाटकात जाणाऱया खासगी बसेसची तपासणी करण्यात आली. या बसेसमधील प्रवाशांकडे आरटीपीसीआर अहवाल नसल्यामुळे या बसेस परत महाराष्ट्रात पाठविण्यात आल्या. कोगनोळी येथील दूधगंगा नदीवरील कर्नाटक सीमा तपासणी केंद्र जवळपास दोन वर्षापासून कार्यरत आहे. गेल्या काही महिन्यात प्रवाशांसाठी शिथिलता देण्यात आली होती. मात्र मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना व ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढू लागल्याने कर्नाटक सीमा तपासनाक्मयावर कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.
शासनाने कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून कर्नाटक-महाराष्ट्र सीमाहद्दीवरील कोगनोळी, शिनोळी, राकसकोप, चलवेनहट्टी, अतिवाड क्रॉस आदी ठिकाणी चेकपोस्ट नाके उभारले आहेत. या ठिकाणी प्रवाशांची कसून चौकशी केली जात आहे.गेल्या दोन दिवसांपासून शासनाने पोलीस प्रशासनाला व तपासनाक्मयावरील अधिकाऱयांना कडक अंमलबजावणीचे आदेश दिल्याने शेकडो वाहने आल्या मार्गाने परत गेली आहेत. याशिवाय महामार्गावर चारचाकी वाहनांच्या लांबलचक रांगा लागलेल्या दिसत आहेत. कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने प्रशासनाबरोबर नागरिकांची चिंता वाढली आहे. दरम्यान, सीमाहद्दीवरील चेकपोस्टवर पुन्हा कडक कारवाई सुरू झाली आहे. वाहनांची अडवणूक करून दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र व आरटीपीसीआरची तपासणी केली जात आहे.
निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे फौजदार अनिल कुंभार, कोगनोळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार एस. ए. टोलगी, राजू गोरखन्नावर यांच्यासह पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि आशा कार्यकर्त्या या नाक्मयावर कार्यरत आहेत.