वेळीच लक्ष दिले नाही तर मोठ्या अपघातास निमंत्रण
प्रतिनिधी / कसबा बीड
करवीर तालुक्यातील कोगे- बहिरेश्वर गावा दरम्यान खडक धरण आहे. या धरणाचे पिलर मुख्य पुलापासून बाजूला सरकले आहेत. गावातील जुन्या वयस्क व्यक्तींकडून मिळालेल्या माहितीनुसार 1976 च्या अगोदर हे पूल पाणी अडवण्यासाठी दगड माती मध्ये तयार केलेले होते. कोगेच्या पश्चिमेस बहिरेश्वर, म्हारूळ, आमशी तसेच बारा वाड्या या गावांना जाण्यासाठी सोयीचे होईल, म्हणून वाहतुकीसाठी व पाणी अडवण्यासाठी सिमेंट,सळी व काँक्रिटीकरण करून पूल बनवण्यात आले होते.
पण सद्यस्थितीमध्ये या पुलाची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. प्रत्येक वेळी या पुलाच्या नूतनीकरणासाठी ग्रामस्थांकडून मागणी होत असून सुद्धा पाटबंधारे विभागाकडून फक्त वरवर डागडूजी केली जाते. पण मुख्य प्रश्न धरण नवीन बांधणे याकडे अक्षम्य असे दुर्लक्ष आहे.