पूर्वसूचना न देताच भारनियमन सुरू : अचानक वीजपुरवठा ठप्प झाल्याने नाराजी
प्रतिनिधी /बेळगाव
कोजागरी पौर्णिमेदिवशी बेळगाव तालुका अंधारात होता. कोणतीही पूर्वसूचना नसताना मंगळवारी सायंकाळनंतर वीजपुरवठा खंडित करण्यात आला. अचानक विद्युतपुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांचीही धावपळ उडाली. तीन ते साडेतीन तास वीज नसल्याने महिलांसह विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागली. तालुक्मयात भारनियमनाला सुरुवात झाली का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
देशात कोळशाचा तुटवडा जाणवत असल्याने त्याचा परिणाम वीजनिर्मितीवर होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. परंतु विजेच्याबाबतीत राज्य स्वयंपूर्ण असून भारनियमनाचे संकट उद्भवणार नाही, असे राज्य सरकारने घोषित केले होते. परंतु आठवडाभरातच बेळगाव तालुक्मयात भारनियमनाला सुरुवात करण्यात आली आहे.
मंगळवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास अचानक वीजपुरवठा ठप्प झाला. थोडय़ावेळाने वीजपुरवठा येईल, असा अंदाज होता. परंतु बराच वेळ वीज न आल्याने हेस्कॉम कार्यालयात फोनाफोनी सुरू झाली. केवळ एक-दोन गावेच नव्हे तर संपूर्ण तालुक्मयातच वीजपुरवठा ठप्प झाल्याचे सांगण्यात आले. रात्री 9 च्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. अचानक वीज गेल्याने महिलावर्गाची धांदल उडाली. विद्यार्थ्यांचीही अभ्यासासाठी गैरसोय झाली.
हेस्कॉमच्या अधिकाऱयांना याबद्दल विचारले असता मंगळवारी बेळगाव शहर व तालुक्मयासाठी मर्यादित वीजपुरवठा आहे. शहरात भारनियमन करणे शक्मय नसल्याने तालुक्मयात काही तास वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून, हीच परिस्थिती पुढे राहिल्यास भारनियमनाचे वेळापत्रक हेस्कॉमकडून जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.