अन्वेषण यंत्रणेच्या अहवालात निष्कर्ष, व्यवस्थात्मक अपयशही कारणीभूत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
विमानाच्या चालकाने केलेले सर्वसाधारण क्रियान्वयन प्रक्रियेचे (एसओपी) उल्लंघन हे कोझीकोड येथे झालेल्या विमान अपघाताचे एक कारण होते, असा निष्कर्ष विमान अपघात अन्वेषण कक्षाने (एएआयबी) आपल्या अहवालात व्यक्त केला आहे. हा अपघात 7 ऑगस्ट 2020 या दिवशी झाला होता. त्यात 21 प्रवाशांच्या मृत्यू झाला होता. विमान उतरल्यानंतर ते धावपट्टीवरुन घसरल्याने हा अपघात झाला होता. अपघातग्रस्त विमानात 190 प्रवासी होते. चालकाच्या चुकीशिवाय व्यवस्थात्मक अपयशही कारणीभूत मानण्यात आले आहे.
बोईंग 737 प्रकारचे हे विमान भर पावसात कोझीकोड विमानतळावर उतरले. उतरल्यानंतर ते धावपट्टीवरुन पुढे जात पलिकडे जाऊन पडले. विमानाचे दोन तुकडे झाले होते. या अपघातात विमानाचे दोन चालक दीपक साठे आणि अखिलेश कुमार यांचाही मृत्यू झाला होता. या अपघाताची चैकशी वर्षभर चालली.
250 पानी अहवाल
चौकशीचा अहवाल 250 पानी आहे. त्यात अपघाताची 57 लहान मोठी कारणे स्पष्ट करण्यात आली आहेत. तसेच भविष्यात असे अपघात घडू नयेत म्हणून 43 महत्वपूर्ण सूचनाही करण्यात आल्या आहेत. पावसामुळे समोरचे दिसण्यात आलेली अडचण, विमानाच्या वायपरची समस्या, विमानतळावरील सुविधा यांसह इतर अनेक कारणे अहवालात स्पष्ट करण्यात आली आहेत.
इशाऱयाकडे दुर्लक्ष
विमान चालकाने विमान उतरविताना धावपट्टीच्या मध्यभागी उतरविले. त्याला नियंत्रण मनोऱयाकडून ‘गो अराऊंड़’ चा इशारा देण्यात आला होता. पण त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे विमान अपेक्षित पद्धतीने उतरले नाही. तसेच धावपट्टीच्या बरेच पुढे गेले. त्यामुळे ते पडून त्याचे तुकडे झाले. नियंत्रण मनोऱयावरी अधिकाऱयानेही गो अराऊंड टप्प्यावर विमानाचे पूर्ण नियंत्रण स्वतःकडे घेतले नाही. परिणामी शेवटच्या टप्प्यग्नात विमानावरील नियंत्रण सुटले. यग्नासाठी चालकाप्रमाणेच विमानतळावरील व्यवस्थाही कारणीभूत आहे, असे अहवालात स्पष्ट करण्यग्नात आले.
विमानचालकांची संख्या अपुरी
एअर इंडियाकडे विमानचालकांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे उपलब्ध विमानचालकांवर अतिरिक्त ताण पडतो. कोझीकोड विमान अपघातातील चालकावरही असा ताण होता. चालकांना अधिक काम करावे लागल्यास त्यांच्याकडून चुका होण्याची शक्यता जास्त असते. एअर इंडियग्नाने विमानचालकांची संख्या वाढवावी आणि त्यांची निवड आणि प्रशिक्षण यासाठी स्वतःची यंत्रणा निर्माण करावी, अशी महत्वपूर्ण सूचनाही अहवालात करण्यात आली आहे.