वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सुनिल मित्तल यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ दावोस
जगामध्ये आजच्या घडीलाही कोटय़वधी लोक इंटरनेटचा वापर करत नाहीत, याचे मुख्य कारण कव्हरेज (क्षेत्र)चा अभाव व न परवडणे ही असल्याचे भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनिल मित्तल यांनी म्हटले आहे. ते दावोस येथे आयोजीत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (डब्ल्यूईएफ)च्या व्हर्च्युअल परिषदेत बोलत होते. औद्योगिक क्रांतीत तंत्रज्ञानाचे सहाय्य या विषयावर त्यांनी आपले मत प्रदर्शित केले.
ते पुढे म्हणाले, डिजिटल तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नसल्याने ते आत्मसात करावे लागणार आहे. देशाने जर का उच्च दर्जाचा इंटरनेट डाटा दर महिन्याला परवडणाऱया दरात दिला तर विकासाला संधी आहे. कोरोनाच्या काळात दूरसंचार सेवा व ब्रॉडबँड सेवेला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. या सेवेच्या माध्यमातून ग्राहकांना लसीकरणाची विस्तृत माहिती, अनेक बिलांची रक्कम अदा करणे, पैसे हस्तांतरण करणे, खाद्य मागवणे आणि इतर अनेक सेवांचा लाभ घेता आला आहे.
अधिकच्या गुंतवणुकीची गरज
मित्तल यांनी याच दरम्यान म्हटले आहे, की दूरसंचार उद्योग एकटाच अंतिमपर्यंत पोहोचू शकत नाही आणि तसेच त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मजबूत योजना आखून त्यामध्ये मोठी गुंतवणूक करण्याची गरज असल्याचेही मित्तल यांनी स्पष्ट केले.