वारणानगर / प्रतिनिधी
कोडोली ता. पन्हाळा येथील दोन एकरातील ऊस जळाल्याने तीन शेतकऱ्यांचे सुमारे चार लाखांचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवार दि. २९ रोजी घडली असून आगीचे कारण समजू शकले नाही.
कोडोली येथील गट नं १७२२ मध्ये शेंद्रीय गुळ उत्पादनासाठी ऊस पिकविणेत आलेल्या दोन ते अडीच एकरातील ऊस अचानक जळाल्याने सुमारे चार लाखांचे नुकसान झाले. प्रकाश गणपती भोसले यांचा एक एकर, संपत पांडूरंग केकरे व गोरख पांडुरंग केकरे या दोघांचे एक एकरातील ऊस जळून खाक झाला. यामुळे या तिन्ही शेतकऱ्यांचे मिळून अंदाजे चार लाखांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी तलाठी अनिल पोवार, कोतवाल सिराज आंबी यांनी भेट देऊन केलेल्या पंचनाम्यात हे नुकसान नोंद केले आहे.