ऑनलाईन टीम / मुंबई :
अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा का दिला याबाबतची माहिती नाही. मात्र, प्रत्येक खाते तोलामोलाचेच असते. त्यामुळे कोणतेही खाते कमीपणाचे मानले तर तो जनतेचा अपमान आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यानंतर एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रीया देताना ते बोलत होते. राऊत म्हणाले, अब्दुल सत्तारांनी राजीनामा का दिला याबाबतची माहिती नाही. याविषयी राज्यातील मंत्रीच बोलतील.
राज्य मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र, खातेवाटप अद्याप झाले नाही. मंत्रिमंडळ विस्तारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगतील. खातेवाटप हा गंभीर विषय असू नये. प्रत्येक खाते तोलामोलाचे असते. त्यामुळे कोणतेही खाते कमीपणाचे वाटून घेऊ नये. तसे झाल्यास तो जनतेचा अपमान ठरेल.