होंडा नारायणनगर येथील सुधांशू घरी परतला : युपेनमध्ये परिस्थिती गंभीर
वाळपई/ प्रतिनिधी
युपेन व रशिया यांच्यादरम्यान सुरू झालेले युद्ध यांच्या पार्श्वभूमीवर युपेनमध्ये कोणत्याही क्षणी काही होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नव्हती. सर्वत्र भयभीत परिस्थिती होती. अशा अवस्थेत भारतीय दूतावासाने चांगल्या प्रकारची व्यवस्था करून आम्हाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. भारत सरकारने यासाठी विशेष लक्ष दिल्यामुळे आज आम्ही सुखरूप घरी परतलो आहोत. मात्र नोकऱयांमध्ये आज भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. कुणाचा कधी जीव जाईल हे सांगता येणार नव्हते. सुदैवाने आम्हाला कोणत्याही संघर्षपूर्ण परिस्थितीला सामोरे जाण्याची पाळी न आल्याची प्रतिक्रिया सुधांशू सालिगुडी या होंडा नारायण नगर येथील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. आज तो सुखरुप घरी परतला.
यावेळी पत्रकारांना माहिती देताना त्यांनी एकूण परिस्थिती व भारतीय दूतावासाने केलेली मदत यांच्या पार्श्वभूमीवर सविस्तरपणे माहिती दिली. सुधांशू हा युपेनमध्ये मेडिकल शिक्षण घेत आहेत. सध्या यूपेन व रशिया यांच्या दरम्यान युद्ध सुरू झालेले आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर भारतातील सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्याचे कार्य सरकारतर्फे करण्यात आलेले आहे.याच पार्श्वभूमीवर आज सुधांशू हा घरी परतला. तीन दिवसापासून तो दिल्लीमध्ये होता. आज सकाळी तो घरी परतला. त्यानंतर त्यांची घरी भेट घेतल्यानंतर सुधांशू यांनी सांगितले की युद्धाची परिस्थिती ही भयंकर स्वरूपाची आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी काही होण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नव्हती. प्रत्येक जण आपला जीव मुठीत धरून जीवन जगत आहे. भारतातील जवळपास तीनशे विद्यार्थी एकसंघ होते .आम्ही एकाच ठिकाणी राहत होतो पैकी गोव्यातील सदर बॅचमध्ये आपण एकदाच होतो. प्रत्येकाने प्रत्येकाला दिलासा देण्याचे काम करत होतो. यामुळे मोठी गंभीर स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र वाटले नाही. जेव्हा युद्ध सुरू झाले त्यावेळी अनेक वेळा बॉम्ब पडल्याची माहिती वेळोवेळी प्राप्त होत होती. ज्या ठिकाणी आम्ही राहत होता त्या पासून जवळपास दोनशे मीटर आवर बॉम्ब पडला होता. तेव्हा मात्र परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र भारतीय दूतावासाने वेळोवेळी सहकार्य केले व केलेल्या मदतीच्या पार्श्वभूमीवर आम्ही आमच्या मायदेशी सुखरूप पोहोचलो याबद्दल समाधान वाटत आहे.
यावेळी त्याच्या कुटुंबाने आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना हे सरकारचे आभार व्यक्त केलेले आहेत. कठीण परिस्थितीमध्ये युपेनमधील सर्व विद्यार्थ्यांना आपल्या मायदेशी घरी पोहोचविण्यासाठी सरकारने केलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. अशा भयानक परिस्थितीत सरकारने दिलेले सहकार्य हे प्रत्येकासाठी आशादायक व दिलासादायक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे।