वार्ताहर / राजापूर
राजापूर तालुक्यातील भू येथे एबी स्वीच बदलण्याचे काम करणाऱया वायरमनचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुकवारी दुपारी घडली. सुनिल यशवंत चौगुले (32, राह.कोतापूर) असे मयत वायरमनचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार महावितरण विभागामध्ये कंत्राटी पध्दतीवर वायरमन म्हणून सेवा बजावणारे कोतापूर जानस्करवाडी येथील सुनिल यशवंत चौगुले शुकवारी दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास भू येथे एबी स्वीच बदलण्याचे काम करत असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यानंतर त्यांना तात्काळ राजापूर ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱयांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेबाबत माहिती मिळताच महावितरणच्या कर्मचाऱयांनी तात्काळ राजापूर ग्रामीण रूग्णालयात धाव घेतली.
Next Article रत्नागिरीत 24 तासात 28 नवे रुग्ण
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.