प्रतिनिधी /बेळगाव
लॉकडाऊनमुळे सर्वांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. त्यात बऱयाच नागरिकांचा पगार कपात करण्यात आल्याने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील बनले आहे. त्यातच भाजीचा दरदेखील वाढल्याने समस्या निर्माण झालेली पहायला मिळत आहे. एरव्ही बाजारात 5 रुपयाला मिळणारी कोथिंबीरची पेंडी सध्या 20 रुपयाला विक्री करत असल्याचे दिसून येत आहे. शहरात कोथिंबीरचा दर 20 रुपये असला तर उपनगरी भागात 30 रुपयाला एक पेंडी विक्री केली जात आहे.
यावेळी कोथिंबीर बरोबरच अन्य भाजींचा दर देखील वाढलेला पाहायला मिळाला. दोडकी 60 रुपये किलो, कांदापात 10 रुपयाला 2, ढबू मिर्ची 60 रुपये किलो, पालक 15 रुपये जोडी, टोमॅटो 30 रुपये किलो, वांगी 100 रुपये किलो, कारली 50 रुपये किलो तर काकडी 100 रुपये किलो दराने विक्री करण्यात येत आहेत.