ऑनलाईन टीम / नगर :
कोपर्डी येथील सामुहिक बलात्कार आणि खून प्रकरणाची सुनावणी आता उच्च न्यायालयात 25 फेबुवारीपासून नियमित सुरू होणार आहे.
या प्रकरणाची सुनावणी 27 जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती तावडे यांच्या खंडपीठासमोर झाली. यावेळी अहमदनगर जिल्हा न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेच्या निश्चितीकरणासाठी राज्य सरकारने दाखल केलेला अर्ज, आरोपी क्रमांक 1,2 व 3 यांनी दाखल केलेले अपील व आरोपी 1 व 3 यांचे अपील दाखल करण्यास झालेला विलंब यावर खंडपीठाने सरकार, पक्ष तसेच आरोपीचे वकील यांचे म्हणणे ऐकून आरोपी क्रमांक 1 व 3 यांचे अर्ज दाखल करण्यास विलंब माफीचा अर्ज दाखल पेला.
हे प्रकरण फाशीच्या शिक्षेचे असल्याने त्यावर लवकरात लवकर सुनावणी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रकरणाची सुनावणी 25 फेब्रुवारीपासून नियमित घेण्याचे आदेश दिले.