प्रतिनिधी/ बेळगाव
भाजीपाल्याचे दर गडगडलेच आहेत. यातच कोबीज, वांगी, बिन्स, मिरची आणि फ्लॉवर यांना तर कवडीमोल किंमत देण्यात येत आहे. यामुळे बळीराजा अक्षरशः हतबल झाला आहे. शेतकऱयांचे जणू कंबरडेच मोडले असून सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोबीज टाकून आपले आंदोलन करून शेतकऱयाची काय अवस्था आहे? हे जिल्हा प्रशासनाला दाखविले. याचबरोबर आमच्या मालाला सरकारने एपीएमसीच्या माध्यमातून प्रत्येक भाजीला किमान दर ठरवावा, अशी मागणी रयत संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
बळीराजा देशाला अन्न पुरवितो. मात्र त्याची अवस्था अशी आहे की त्यालाच अन्न मिळणे कठीण झाले आहे. कारण सरकारी कर्मचाऱयांचे पगार भरमसाट वाढविले जातात. मात्र शेतकऱयाच्या मालाला सरकार दर ठरवत नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. तेव्हा अन्नदात्याला जगण्यास सरकारने काही तरी तरतूद करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावषी महापुरामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्या महापुरातून सावरत शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र उत्पादित केलेल्या मालालाच योग्य भाव मिळत नाही. गेल्या काही दिवसांपासून कोबीज केवळ दीड ते दोन रुपये किलोने घेतले जात आहे. शेतामध्ये कोबीज नेण्यासाठी आल्यानंतर एक ट्रक कोबीजला केवळ 5 हजार रुपये दिले जात आहेत. यामुळे खर्च 45 हजार आणि उत्पादन 10 हजार होत आहे. या दरामुळे जीवन जगायचे अवघड झाले आहे. प्रत्येक शेतकऱयाला एकरी 30 ते 40 हजाराचा फटका बसू लागला आहे. तेव्हा सरकारने तातडीने एपीएमसीच्या माध्यमातून भाजीपाला खरेदी करावा, अशी मागणी करण्यात आली.
शिरस्तेदार एम. एम. नदाफ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आप्पासाहेब देसाई, सुभाष धायगोंडे, बाळू मायण्णा, रामचंद्र फडके, रामनगौडा पाटील, टोपाण्णा बसरीकट्टी, मारुती बुरली, नामदेव, निंगाप्पा चुरमुरी, राजू कागणीकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.